शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नाशिक जिल्ह्यात आजवर ७५ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:55 IST

जिल्ह्यात चालू वर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील कौतिक बाबूराव अहिरे

ठळक मुद्देदर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित निफाड तालुक्यातही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील शेतक-याने आत्महत्या केली असून, जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत ७५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव त्या खालोखाल निफाड व बागलाण तालुक्यांत झाल्या आहेत.जिल्ह्यात चालू वर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील कौतिक बाबूराव अहिरे या ५० वर्षीय शेतक-याने आत्महत्या केली. त्याच्या पत्नीच्या नावे शेतजमीन असून, त्याच्यावर सोसायटीचे बोझा असल्यामुळे कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजवर ७५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मालेगाव तालुक्यात झाल्या आहेत. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या संपन्न मानल्या गेलेल्या निफाड तालुक्यातही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने कर्जबाजारी शेतक-यांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्जमाफ केल्याने शेतकरी आत्महत्येत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही आत्महत्येचे प्रमाण कायम आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक