शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नाशिकमध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना बसला अवकाळी पावसाचा फटका

By अझहर शेख | Updated: April 19, 2023 13:02 IST

३० हजार हेक्टर कांदापिकाचा चिखल

अझहर शेख, नाशिक: जिल्ह्याला ७ ते १७ एप्रिल या कालावधीत वादळी गडगडाटी अवकाळी पाऊस व गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यामुळे पंधरा तालुक्यांमधील ७८० गावे बाधित झाली आहेत. सुमारे ६६ हजार ९२३ शेतकऱ्यांच्या शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. मागील महिनाभरापासून अवकाळी पावसाचा सामना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळी पावसासह गारपीटही झाल्यामुळे नुकसानीमध्ये अधिकच भर पडली. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा असतो. मात्र, या वर्षी अवकाळी पावसाने दोन आठवडे हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

मागील ४५ दिवसांत जिल्ह्यात ४१ मिमी इतका अवकाळी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे ३७ हजार ९८१ हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. यामध्ये ३० हजार २५६ हेक्टर क्षेत्रावरील कांदापिकाचा अक्षरक्ष: चिखल झाला. याशिवाय २ हजार ६४५ हेक्टरवरील द्राक्षबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. १ हजार ७१५ हेक्टरवरील पालेभाज्या, फळभाज्या पिकाचेही नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान सटाणा-बागलाण तालुक्यात झाले असून, तेथील २३ हजार ४२२ हेक्टरवरील शेतपिकांची अवकाळी पावसामुळे नासाडी झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. याच तालुक्यातील १५२ गावांमधील ३४ हजार ६४५ शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

तालुकानिहाय शेतीचे नुकसान (हेक्टरी)

तालुका -- गावे---- बाधित शेतकरी --------- क्षेत्र

  • सटाणा- १५२---- ३४,६४५ ------------- २३,४२२
  • मालेगाव - ४४------- १,४६६ ------------- ००,९१५
  • नांदगाव - ५७---------१२,७५२ ------------- ५,४४४
  • कळवण- ४३ ---------१,६३४ ----------------०,७२४
  • देवळा - ०७-----------६३४ ---------------- ०३५५
  • दिंडोरी- ११३------- ३,०६५ ---------------- १,८६६
  • सुरगाणा- १०६-----------२,१४८ -----------------०,५६८
  • नाशिक- ५३------------- १,१७५ ----------------०,५९७
  • त्र्यंबकेश्वर- १३ ------------- ७७ -----------------०,०१८
  • पेठ---- २३-------------- ३५६ -----------------०२१४
  • इगतपुरी - २३---------- १,९६९------ -------०,५४४
  • निफाड- ८०------------- ३,०२६ --------------- १,५४६
  • सिन्नर- २६---------------६३७ ------------------०,३७७
  • चांदवड- २५------------ ३,१७९ ---------------- १,२९४
  • येवला - १५-------------- १६० ------------------०,०९२
  • एकूण - ७८०             ६६,९२३ -------------- ३७,९८१

शेतपिकांचे नुकसान (हेक्टरी)

  • कांदा - ३०,२५६
  • द्राक्षे - २,६४५
  • भाजीपाला - १,७१५
  • डाळिंब - ९९७
  • गहू - ७२३
  • आंबा - ५००
  • मका - ३८०
  • टोमॅटो - ३२६
  • बाजरी - २२६
टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी