शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये ६५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 23:23 IST

नाशिक : जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसला नसला तरी जुलैच्या उत्तरार्धात झालेला पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ६५ टक्क्यांवर पोहचला आहे. गत वर्षीच्या तुलनेत साठा १२ टक्क्यांनी कमी असल्याने जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : गतवर्षीच्या तुलनेत साठा कमीच

नाशिक : जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसला नसला तरी जुलैच्या उत्तरार्धात झालेला पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ६५ टक्क्यांवर पोहचला आहे. गत वर्षीच्या तुलनेत साठा १२ टक्क्यांनी कमी असल्याने जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

हवामान खात्याने यंदा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली असली तरी जिल्ह्यात अजूनही अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. धरणांच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ समाधानकारक असतांना दुसरीकडे शेतकऱ्यांनाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे. काही तालुक्यांमध्ये दमदार झालेल्या पावसामुळे धरणातील साठा झपाट्याने वाढण्यास मदत झाली आहे.

गंगापूर समूहाचा जलसाठा ८४ तर दारणा जलसमूहाचा साठा ८० टक्क्यांवर पोहचला आहे. तर गिरणा जलसमूहात ५२ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांत एकूण ६५ टक्के जलसाठा आहे. मात्र गतवर्षी या कालावधीत धरणामध्ये ७७ टक्के इतका साठा होता. धरणातील साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असला तरी शेती आणि उद्योगाचेदेखील आवर्तन असल्यामुळे त्याचेही नियोजन करावे लागणार आहे.गंगापूर धरणातील साठा ९१ टक्क्यांवर पोहचला असल्याने येथून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात इतरत्र फारसा पाऊस नसला तरी धरण समूहातील पावसामुळे गंगापूर धरणाची पातळी वाढतच आहे. दरम्यान, हवामान खात्याने रविवारपासून पावासाचे पुनरागमन होणार असल्याचे संकेत दिल्याने गंगापूरमधून विसर्गलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.धरणनिहाय पाणीसाठा (टक्केवारीत)गंगापूर - ९१कश्यपी -६६गौतमी गोदावरी - ७३आळंदी - १००पालखेड - ८०करंजवण- ४०वाघाड - ७२ओझरखेड - ३१पुणेगाव -४९तिसगाव - १२दारणा - ९०भावली -१००मुकणे - ५८वालदेवी- १००कडवा - ९२नांदूरमध्यमेश्वर - ९८भोजापूर - २२चणकापूर - ८१हरणबारी - १००केळझर - ८५नागासाक्या - १९गिरणा - ४५पुनद -८८माणिकपुंज - १००

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस