शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 01:19 IST

जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान

 

नाशिक : मतदान यंत्रात अचानक झालेल्या बिघाडामुळे काही काळ झालेला खोळंबा, यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारींमुळे माघारी फिरलेले मतदार व प्रतिस्पर्ध्यांकडून पैसे वाटप होत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारींमुळे काही ठिकाणी झालेली बाचाबाची वगळता जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७३ टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाले असून, सर्वात कमी मतदान नाशिक पूर्व मतदारसंघात ५२ टक्के इतके झाले. दरम्यान, शहरातील गंगापूररोडवरील एका मतदान केंद्रात मतदान करून परतणारी महिला व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्यात वाद होऊन झालेली फ्रीस्टाईल पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६० टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविले गेले होते, तर गेल्या विधानसभा निवडणुकीची टक्केवारी ५८ इतकी होती. यंदा मात्र ही टक्केवारी कमालीची वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या टक्केवारीने देशातील सत्तापरिवर्तनाचा इतिहास पाहता, विधानसभेतही वाढलेली टक्केवारी व सर्वपक्षीयांची स्वबळाची आजमावणी पाहता, वाढलेला टक्का विद्यमान सत्ताधाऱ्यांना हादरा देतो की हात, याविषयी अंदाज बांधले जात आहेत. या मतदानाने जिल्ह्यातील १७३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रांत बंद झाल्याने आता त्याचा फैसला रविवार (दि. १९) होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या दोन तासांत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. नऊ वाजेनंतर शहरी मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला. कडक उन्हाचा चटका बसत असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली; मात्र लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांमधील उत्साह काहीसा कमी दिसून आला. शहरी भागातील झोपडपट्ट्यांमधील मतदार अपेक्षेने चार वाजेपर्यंत बसून राहिले. शेवटच्या तासात मात्र त्यांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याने मतदानाची वेळ संपुष्टात आल्यावर सहा वाजेनंतरही काही ठरावीक ठिकाणी रांगा कायम राहिल्या. पहिल्यांदाच सर्व पक्ष स्वबळावर ताकद आजमावत असल्यामुळे या निवडणुकीत सर्वपक्षीय प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, अखेरच्या क्षणापर्यंतही मतदारांच्या मनाचा ठाव न लागू देणाऱ्या या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४२०८ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी ६ वाजताच मतदान कर्मचाऱ्यांनी तयारी पूर्ण करून साडेसहा वाजेपर्यंत मतदानाची रंगीत तालीम (मॉकपोल) केले. यादरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्र सुरू होत नसल्याचे लक्षात येताच ७ वाजेपूर्वी ते बदलून घेण्यात आले, तर काही ठिकाणी मतदानप्रक्रिया सुरू झाल्यावर यंत्र नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अर्धा ते पाऊण तासापर्यंत मतदानप्रक्रिया बंद पडली. परिणामी सकाळी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या मतदारांच्या रांगा लागल्या. त्यातही वयोवृद्ध मतदारांनी मात्र उशीर होत असल्याचे कारण देत माघारी फिरणे पसंत केले.