शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 01:19 IST

जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान

 

नाशिक : मतदान यंत्रात अचानक झालेल्या बिघाडामुळे काही काळ झालेला खोळंबा, यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारींमुळे माघारी फिरलेले मतदार व प्रतिस्पर्ध्यांकडून पैसे वाटप होत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारींमुळे काही ठिकाणी झालेली बाचाबाची वगळता जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७३ टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाले असून, सर्वात कमी मतदान नाशिक पूर्व मतदारसंघात ५२ टक्के इतके झाले. दरम्यान, शहरातील गंगापूररोडवरील एका मतदान केंद्रात मतदान करून परतणारी महिला व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्यात वाद होऊन झालेली फ्रीस्टाईल पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६० टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविले गेले होते, तर गेल्या विधानसभा निवडणुकीची टक्केवारी ५८ इतकी होती. यंदा मात्र ही टक्केवारी कमालीची वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या टक्केवारीने देशातील सत्तापरिवर्तनाचा इतिहास पाहता, विधानसभेतही वाढलेली टक्केवारी व सर्वपक्षीयांची स्वबळाची आजमावणी पाहता, वाढलेला टक्का विद्यमान सत्ताधाऱ्यांना हादरा देतो की हात, याविषयी अंदाज बांधले जात आहेत. या मतदानाने जिल्ह्यातील १७३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रांत बंद झाल्याने आता त्याचा फैसला रविवार (दि. १९) होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या दोन तासांत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. नऊ वाजेनंतर शहरी मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला. कडक उन्हाचा चटका बसत असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली; मात्र लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांमधील उत्साह काहीसा कमी दिसून आला. शहरी भागातील झोपडपट्ट्यांमधील मतदार अपेक्षेने चार वाजेपर्यंत बसून राहिले. शेवटच्या तासात मात्र त्यांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याने मतदानाची वेळ संपुष्टात आल्यावर सहा वाजेनंतरही काही ठरावीक ठिकाणी रांगा कायम राहिल्या. पहिल्यांदाच सर्व पक्ष स्वबळावर ताकद आजमावत असल्यामुळे या निवडणुकीत सर्वपक्षीय प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, अखेरच्या क्षणापर्यंतही मतदारांच्या मनाचा ठाव न लागू देणाऱ्या या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४२०८ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी ६ वाजताच मतदान कर्मचाऱ्यांनी तयारी पूर्ण करून साडेसहा वाजेपर्यंत मतदानाची रंगीत तालीम (मॉकपोल) केले. यादरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्र सुरू होत नसल्याचे लक्षात येताच ७ वाजेपूर्वी ते बदलून घेण्यात आले, तर काही ठिकाणी मतदानप्रक्रिया सुरू झाल्यावर यंत्र नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अर्धा ते पाऊण तासापर्यंत मतदानप्रक्रिया बंद पडली. परिणामी सकाळी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या मतदारांच्या रांगा लागल्या. त्यातही वयोवृद्ध मतदारांनी मात्र उशीर होत असल्याचे कारण देत माघारी फिरणे पसंत केले.