शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा तालुक्यात ६२.७० टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:47 IST

निवडणूक : ५८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रात बंद

सटाणा : जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बागलाण तालुक्यात ६२.७० टक्के मतदान काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. जिल्हापरिषदेच्या सात जागांसाठी सत्तावीस उमेदवारांचे व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी ५८ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे.  बागलाण तालुक्यात आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळ पासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या दुपारी बारा वाजे पर्यंत तालुक्यात बावीस टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजे नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली होती.दुपारी साडे तीन वाजे पर्यंत ४७.३० टक्के मतदान झाले. नामपूर व जायखेडा गटात बहुतांश ठिकाणी मतदार याद्यांचा घोळ झाल्यामुळे बहुतांश मतदारांना आपल्या हक्का पासून वंचित राहावे लागले.  लखमापूर येथील रात्री सव्वा आठ वाजे पर्यंत मतदान प्रक्रि या सुरु होती. पठावेदिगर गटात सर्वाधिक ७३.१४ टक्के मतदान झाले. ३०३९४ मतदारांपैकी २२२३१ मतदारांनी आपला हक्का बजावला.ताहाराबाद गटात ३१८३८ मतदारांपैकी १६६७१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून ५२.३६ टक्के मतदान झाले. जायखेडा गटात एकूण ३५२६५ मतदारांपैकी २४४७९ मतदारांनी हक्क बजावला. तेथे ६९.४१ टक्के मतदान झाले. नामपूर गटात ५५.४४ टक्के इतके मतदान झाले.एकूण ३४५८४ पैकी १९१७४ मतदारांनी आपला हक्क बजावला.वीरगाव गटात ५८.८७ टक्के मतदान झाले असून एकूण ३३८३१ पैकी १९९१८ मतदारांनी आपला हक्क बजावला ,ठेंगोडा गटात ६१.५३ टक्के मतदान झाले. एकूण ३४२०० पैकी २१०४३ मतदारांनी मतदान केले. ब्राम्हणगाव गटात ६८.५८ टक्के मतदान झाले. एकूण ३३२४१ पैकी २२७९७ मतदारांनी मतदान केले. मतदानासाठी पोलीस निरीक्षक बशीर शेख ,विजय ठाकूरवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर ,गणेश गुरव ,कृष्णा घायवट आदी अधिकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पिंपळकोठे येथे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान काही नागरिकांनी तळवाडे भामेर पोच कालव्याला विना परवानगी पाणी सोडलेले पाणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी बंद केले. त्याचा निषेध म्हणून आज दुपारी अचानक एका जमावाने मतदानावर बिहष्कार टाकला म्हणून नागरिकांना मतदान करण्यास एक प्रकारे मज्जाव केला. मात्र सतर्क पोलीस यंत्रणेमुळे मतदान प्रक्रि या सुरळीत झाली होती.  माजी आमदार संजय चव्हाण यांनी संबधित नागरिकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र तरूण शेतकरी ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे चव्हाण यांना माघारी परतावे लागले. (वार्ताहर)