शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

सटाणा तालुक्यात ६२.७० टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:47 IST

निवडणूक : ५८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रात बंद

सटाणा : जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बागलाण तालुक्यात ६२.७० टक्के मतदान काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. जिल्हापरिषदेच्या सात जागांसाठी सत्तावीस उमेदवारांचे व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी ५८ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे.  बागलाण तालुक्यात आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळ पासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या दुपारी बारा वाजे पर्यंत तालुक्यात बावीस टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजे नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली होती.दुपारी साडे तीन वाजे पर्यंत ४७.३० टक्के मतदान झाले. नामपूर व जायखेडा गटात बहुतांश ठिकाणी मतदार याद्यांचा घोळ झाल्यामुळे बहुतांश मतदारांना आपल्या हक्का पासून वंचित राहावे लागले.  लखमापूर येथील रात्री सव्वा आठ वाजे पर्यंत मतदान प्रक्रि या सुरु होती. पठावेदिगर गटात सर्वाधिक ७३.१४ टक्के मतदान झाले. ३०३९४ मतदारांपैकी २२२३१ मतदारांनी आपला हक्का बजावला.ताहाराबाद गटात ३१८३८ मतदारांपैकी १६६७१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून ५२.३६ टक्के मतदान झाले. जायखेडा गटात एकूण ३५२६५ मतदारांपैकी २४४७९ मतदारांनी हक्क बजावला. तेथे ६९.४१ टक्के मतदान झाले. नामपूर गटात ५५.४४ टक्के इतके मतदान झाले.एकूण ३४५८४ पैकी १९१७४ मतदारांनी आपला हक्क बजावला.वीरगाव गटात ५८.८७ टक्के मतदान झाले असून एकूण ३३८३१ पैकी १९९१८ मतदारांनी आपला हक्क बजावला ,ठेंगोडा गटात ६१.५३ टक्के मतदान झाले. एकूण ३४२०० पैकी २१०४३ मतदारांनी मतदान केले. ब्राम्हणगाव गटात ६८.५८ टक्के मतदान झाले. एकूण ३३२४१ पैकी २२७९७ मतदारांनी मतदान केले. मतदानासाठी पोलीस निरीक्षक बशीर शेख ,विजय ठाकूरवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर ,गणेश गुरव ,कृष्णा घायवट आदी अधिकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पिंपळकोठे येथे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान काही नागरिकांनी तळवाडे भामेर पोच कालव्याला विना परवानगी पाणी सोडलेले पाणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी बंद केले. त्याचा निषेध म्हणून आज दुपारी अचानक एका जमावाने मतदानावर बिहष्कार टाकला म्हणून नागरिकांना मतदान करण्यास एक प्रकारे मज्जाव केला. मात्र सतर्क पोलीस यंत्रणेमुळे मतदान प्रक्रि या सुरळीत झाली होती.  माजी आमदार संजय चव्हाण यांनी संबधित नागरिकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र तरूण शेतकरी ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे चव्हाण यांना माघारी परतावे लागले. (वार्ताहर)