शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

 ६ शासकीय व २४ खासगी टॅँकर, ७५ फेऱ्याद्वावरे वाटप, ३ विहीरी अधिग्रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:51 IST

सिन्नर : यावर्षी तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

सिन्नर : यावर्षी तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने टॅँकरची मागणी वाढू लागली आहे. परिणामी दीड महिन्याच्या कालावधीत दोन गावे व १०० वाड्या-वस्त्यांची भर वाढल्याने टॅँकरच्या फेºयांमध्ये तिपटीने वाढ करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात १३ गावे व १५३ वाड्या-वस्त्यांना दररोज ३० टॅँकरद्वारे ७५ खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी ३ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षाही अल्प राहिल्याने सर्वत्रच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संपुर्ण पावसाळ्यात तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाने सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तालुका दुष्काळी जाहीर झाला असला तरी दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांची जनतेला अद्याप प्रतिक्षा आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालेला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात सर्वाधिक गावांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. सर्वच जलस्रोत ठणठणीत कोरडे पडल्याने विहिरींमध्ये थेंबभरही पाणी राहिले नाही. पाण्याचा शोध सुरु असून त्यासाठी ठिकठिकाणी कुपनलिका, विहिरी खोदण्याचे काम करुनही पाणीच मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. ‘विहिरीत नाही तर पोहोºयात कोठून येणार’ अशी अनुभूती तालुक्यातील शेतकºयांना येत आहे. पिण्याच्या पाण्यावर मात करण्यासाठी तालुका पंचायत समिती प्रशासाने योग्य नियोजन केल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत टँकर पोहोचू शकले. या टँकरच्या मागणीतही रोज भर पडते आहे. तालुक्यातील १२६ गावांपैकी तब्बल १३ गावांची व १५३ वाड्या वस्त्यांची तहान टँकरवर भागविली जात आहे.

 

टॅग्स :Waterपाणी