शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 19:29 IST

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

ठळक मुद्देगंगापूरमध्ये ४९ टक्केउन्हाळ्यामुळे वाढले बाष्पीभवनपाण्याच्या वापरात वाढ

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षाही सुमारे दीडशे टक्के पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यमस्वरूपाच्या असलेल्या २४ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठले होते. धरणांची साठवण क्षमता संपुष्टात आल्याने एकाच वेळी जवळपास तेरा धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पावसाचे मुबलक प्रमाण, धरणांतील साठा, नद्या, नाल्यांना आलेला पूर पाहता जमिनीखालील पाण्याच्या पातळीतही जवळपास चार ते पाच फूट पाण्याची पातळी वाढल्याने यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भासणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्वच धरणांमध्ये सरासरी ९९ टक्के जलसाठा कायम होता. त्यानंतर मात्र सिंचनाचे आवर्तन धरणांमधून सोडण्यात आले, त्याचबरोबर धरणांमध्ये विविध कारणांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण सोडण्यात आले. अशातच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले.

जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, त्यात आता फक्त २८ हजार ९३७ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक राहिले आहे. म्हणजेच धरणांमध्ये ४४ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी दारणा धरणात ७६ टक्के इतके शिल्लक असून, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ९९ टक्के जलसाठा आहे. मालेगावसह जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात यंदा ४१ टक्के पाणी असून, ओझरखेड ४८, चणकापूर ३८, हरणबारी ५५, पालखेड ३४ टक्के पाणी शिल्लक आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवनाचा प्रकार पाहता उपलब्ध ४४ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.

दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात सध्या ४९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण २६ टक्क्यांवर होते. सध्या गंगापूर धरणात ४४, कश्यपीत ८९, गौतमी गोदावरीत ३४ व आळंदीमध्ये ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणावर मराठवाडा, नगर जिल्ह्याचे आरक्षण आहे. त्याचबरोबर एचएएल, औद्योगिक वसाहत, एकलहरे वीज निर्मिती केंद्रालाही पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण