शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 19:29 IST

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

ठळक मुद्देगंगापूरमध्ये ४९ टक्केउन्हाळ्यामुळे वाढले बाष्पीभवनपाण्याच्या वापरात वाढ

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षाही सुमारे दीडशे टक्के पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यमस्वरूपाच्या असलेल्या २४ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठले होते. धरणांची साठवण क्षमता संपुष्टात आल्याने एकाच वेळी जवळपास तेरा धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पावसाचे मुबलक प्रमाण, धरणांतील साठा, नद्या, नाल्यांना आलेला पूर पाहता जमिनीखालील पाण्याच्या पातळीतही जवळपास चार ते पाच फूट पाण्याची पातळी वाढल्याने यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भासणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्वच धरणांमध्ये सरासरी ९९ टक्के जलसाठा कायम होता. त्यानंतर मात्र सिंचनाचे आवर्तन धरणांमधून सोडण्यात आले, त्याचबरोबर धरणांमध्ये विविध कारणांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण सोडण्यात आले. अशातच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले.

जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, त्यात आता फक्त २८ हजार ९३७ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक राहिले आहे. म्हणजेच धरणांमध्ये ४४ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी दारणा धरणात ७६ टक्के इतके शिल्लक असून, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ९९ टक्के जलसाठा आहे. मालेगावसह जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात यंदा ४१ टक्के पाणी असून, ओझरखेड ४८, चणकापूर ३८, हरणबारी ५५, पालखेड ३४ टक्के पाणी शिल्लक आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवनाचा प्रकार पाहता उपलब्ध ४४ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.

दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात सध्या ४९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण २६ टक्क्यांवर होते. सध्या गंगापूर धरणात ४४, कश्यपीत ८९, गौतमी गोदावरीत ३४ व आळंदीमध्ये ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणावर मराठवाडा, नगर जिल्ह्याचे आरक्षण आहे. त्याचबरोबर एचएएल, औद्योगिक वसाहत, एकलहरे वीज निर्मिती केंद्रालाही पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण