शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात १६ गावे व २११ वाड्या-वस्त्यांवर ४१ टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 17:53 IST

सिन्नर : तालुक्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत घट होत असून, अनेक विहिरी व कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. ग्रामीण भागात उन्हाबरोबर पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहे. दुसरीकडे पशुधनाचे देखील चारा पाण्यासाठी हाल होत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच तालुक्यात टॅँकरने चाळीशी गाठली आहे. सध्या तालुक्यातील १६ गावे व २११ वाड्या - वस्त्यांवर ४१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागविली जात आहे.

विहीरींनी तळ गाठल्याने वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तीव्र टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुका पंचायत समिती स्तरावर टॅँकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या अनेक भागात चारा व पाणी टंचाई जाणवत आहेत. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामाची पिके वाया गेली, तर रब्बीची पेरणी झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. त्याचबरोबर पुर्व भागात भूजल पातळीही झपाट्याने खालवत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सररासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे सिन्नरसारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यातील शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुक्यात वाढत्या उन्हाबरोबर पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. पूर्व भागातील अनेक गावे पाणी टंचाईने बाधीत झाली आहेत. यावर्षी शेतीसाठी पाणी सोडाच; परंतु पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने सुमारे लाखांच्यापुढे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर विसंबून रहावे लागते आहे. काडी गावांच्या पूरक नळपाणी पुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरी आटल्याने ग्रामपंचायतींच्या योजना कोलमडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात उशीराच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात दिलासा दिला आहे. मात्र या उलट पूर्व भागात पाऊसच झाला नसल्याने नद्या, नाले, नालाबडींग, पाझर तलाव, सिमेंट बंधारे कोरडे पडले आहेत. परिणामी भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने विहिरी आटल्या आहेत. उन्हाची तीव्र वाढल्याने ज्या विहिरींना अद्यापपर्यंत थोड्याफार प्रमाणात पाणी होते त्यांचे पाणी आटले आहे. पिण्यासाठी वणवण भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने पंचायत समितीकडून ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. तालुक्यात गेल्या वर्षीपासून टॅँकरने काही गावांची तहान भागविली जात आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत टॅँकरची संख्या वाढतच गेली आहे. तालुक्याच्या काही भागात चारा व पाणी या दोन्ही गोष्टी सद्या शेतकऱ्यांना विकतच घ्यावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanchayat samitiपंचायत समिती