शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

सिन्नर तालुक्यात १६ गावे व २११ वाड्या-वस्त्यांवर ४१ टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 17:53 IST

सिन्नर : तालुक्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत घट होत असून, अनेक विहिरी व कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. ग्रामीण भागात उन्हाबरोबर पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहे. दुसरीकडे पशुधनाचे देखील चारा पाण्यासाठी हाल होत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच तालुक्यात टॅँकरने चाळीशी गाठली आहे. सध्या तालुक्यातील १६ गावे व २११ वाड्या - वस्त्यांवर ४१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागविली जात आहे.

विहीरींनी तळ गाठल्याने वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तीव्र टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुका पंचायत समिती स्तरावर टॅँकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या अनेक भागात चारा व पाणी टंचाई जाणवत आहेत. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामाची पिके वाया गेली, तर रब्बीची पेरणी झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. त्याचबरोबर पुर्व भागात भूजल पातळीही झपाट्याने खालवत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सररासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे सिन्नरसारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यातील शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुक्यात वाढत्या उन्हाबरोबर पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. पूर्व भागातील अनेक गावे पाणी टंचाईने बाधीत झाली आहेत. यावर्षी शेतीसाठी पाणी सोडाच; परंतु पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने सुमारे लाखांच्यापुढे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर विसंबून रहावे लागते आहे. काडी गावांच्या पूरक नळपाणी पुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरी आटल्याने ग्रामपंचायतींच्या योजना कोलमडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात उशीराच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात दिलासा दिला आहे. मात्र या उलट पूर्व भागात पाऊसच झाला नसल्याने नद्या, नाले, नालाबडींग, पाझर तलाव, सिमेंट बंधारे कोरडे पडले आहेत. परिणामी भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने विहिरी आटल्या आहेत. उन्हाची तीव्र वाढल्याने ज्या विहिरींना अद्यापपर्यंत थोड्याफार प्रमाणात पाणी होते त्यांचे पाणी आटले आहे. पिण्यासाठी वणवण भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने पंचायत समितीकडून ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. तालुक्यात गेल्या वर्षीपासून टॅँकरने काही गावांची तहान भागविली जात आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत टॅँकरची संख्या वाढतच गेली आहे. तालुक्याच्या काही भागात चारा व पाणी या दोन्ही गोष्टी सद्या शेतकऱ्यांना विकतच घ्यावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanchayat samitiपंचायत समिती