शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

३८ गाव योजनेची उपसचिवांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:29 IST

जागतिक बँकेने गौरविलेल्या व तेलंगणा राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतील केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून, योजनेच्या कामकाजाचे त्यांनी कौतुकही केले.

ठळक मुद्देयोजनेची घेतली माहिती : पाणीपुरवठ्याचे केले कौतुक

येवला : जागतिक बँकेने गौरविलेल्या व तेलंगणा राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतील केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून, योजनेच्या कामकाजाचे त्यांनी कौतुकही केले.टँकरग्रस्त असलेल्या ३८ गावांना टँकरमुक्त करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या या योजनेने सद्यस्थितीत ५६ गावांना टँकरमुक्त केले आहे. विशेष म्हणजे ही योजना शासन नव्हे तर लोकप्रतिनिधींची व्यवस्थापन समिती चालवित आहे. अनेक योजना तोट्यात असताना ही योजना मात्र नफ्यात सुरु आहे.यामुळे हैदराबाद येथे झालेल्या जागतिक बँकेच्या कार्यशाळेत या योजनेचा देशातील अव्वल योजना म्हणून दोन वर्षांपूर्वी गौरव झालेला आहे. तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एका समितीने योजनेची पाहणी केली होती. त्यानंतर या योजनेच्या धर्तीवर आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या दुष्काळी स्थिती असतानाही योजनेने ५६ गावांना पाणीटंचाईची झळ नाही. त्यामुळेच शुक्ला योजनेचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांनी बाभूळगाव येथील योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राची तसेच साठवण तलावाची पाहणी केली. किती लोकांची तहान ही योजना भागविते, दिवसाला किती पाणी दिले जाते, ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आकारणी कशी केली जाते, वसुली कशी होते, योजनेचा खर्च काय आहे, यासंदर्भातील माहिती त्यांनी घेतली. तसेच त्यांनी नांदेसर ग्रामपंचायतीलाही भेट दिली.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी