शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

३८ गाव योजनेची उपसचिवांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:29 IST

जागतिक बँकेने गौरविलेल्या व तेलंगणा राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतील केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून, योजनेच्या कामकाजाचे त्यांनी कौतुकही केले.

ठळक मुद्देयोजनेची घेतली माहिती : पाणीपुरवठ्याचे केले कौतुक

येवला : जागतिक बँकेने गौरविलेल्या व तेलंगणा राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतील केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून, योजनेच्या कामकाजाचे त्यांनी कौतुकही केले.टँकरग्रस्त असलेल्या ३८ गावांना टँकरमुक्त करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या या योजनेने सद्यस्थितीत ५६ गावांना टँकरमुक्त केले आहे. विशेष म्हणजे ही योजना शासन नव्हे तर लोकप्रतिनिधींची व्यवस्थापन समिती चालवित आहे. अनेक योजना तोट्यात असताना ही योजना मात्र नफ्यात सुरु आहे.यामुळे हैदराबाद येथे झालेल्या जागतिक बँकेच्या कार्यशाळेत या योजनेचा देशातील अव्वल योजना म्हणून दोन वर्षांपूर्वी गौरव झालेला आहे. तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एका समितीने योजनेची पाहणी केली होती. त्यानंतर या योजनेच्या धर्तीवर आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या दुष्काळी स्थिती असतानाही योजनेने ५६ गावांना पाणीटंचाईची झळ नाही. त्यामुळेच शुक्ला योजनेचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांनी बाभूळगाव येथील योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राची तसेच साठवण तलावाची पाहणी केली. किती लोकांची तहान ही योजना भागविते, दिवसाला किती पाणी दिले जाते, ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आकारणी कशी केली जाते, वसुली कशी होते, योजनेचा खर्च काय आहे, यासंदर्भातील माहिती त्यांनी घेतली. तसेच त्यांनी नांदेसर ग्रामपंचायतीलाही भेट दिली.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी