शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

३४६ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:31 IST

कर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्जमाफ करण्याची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्णातील ३४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले असून, कर्जमाफीची तसेच दहा हजार रुपयांचे पीककर्ज देण्याची घोषणा करून महिना उलटला तरी त्याचा लाभ झाला नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यावर सरकारनेही आपली भूमिका मांडताना ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली त्या कुटुंबीयांच्या नावे असलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली असली तरी, त्याच्या डोक्यावर असलेले कर्ज त्याच्या कुटुंबीयांच्या डोक्यावर कायम होते, किंबहुना सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना फेर कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या. चालू वर्षी ६४ आत्महत्याशेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढच होत असून, चालू वर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी सन २०११ (३४), २०१२ (१९), २०१३ (१५), २०१४ (४२), २०१५ (८५), २०१६ (८७) २०१७ (६४) शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्णात गेल्या सहा वर्षांत ३४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सन २०१५ ते १७ या तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याने तर अधिकच चिंता व्यक्त करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांना रोखण्यात शासनाला अपयश आले आहे.