शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

३४६ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:31 IST

कर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्जमाफ करण्याची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्णातील ३४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले असून, कर्जमाफीची तसेच दहा हजार रुपयांचे पीककर्ज देण्याची घोषणा करून महिना उलटला तरी त्याचा लाभ झाला नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यावर सरकारनेही आपली भूमिका मांडताना ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली त्या कुटुंबीयांच्या नावे असलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली असली तरी, त्याच्या डोक्यावर असलेले कर्ज त्याच्या कुटुंबीयांच्या डोक्यावर कायम होते, किंबहुना सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना फेर कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या. चालू वर्षी ६४ आत्महत्याशेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढच होत असून, चालू वर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी सन २०११ (३४), २०१२ (१९), २०१३ (१५), २०१४ (४२), २०१५ (८५), २०१६ (८७) २०१७ (६४) शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्णात गेल्या सहा वर्षांत ३४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सन २०१५ ते १७ या तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याने तर अधिकच चिंता व्यक्त करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांना रोखण्यात शासनाला अपयश आले आहे.