शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

३४६ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:31 IST

कर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्जमाफ करण्याची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्णातील ३४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले असून, कर्जमाफीची तसेच दहा हजार रुपयांचे पीककर्ज देण्याची घोषणा करून महिना उलटला तरी त्याचा लाभ झाला नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यावर सरकारनेही आपली भूमिका मांडताना ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली त्या कुटुंबीयांच्या नावे असलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली असली तरी, त्याच्या डोक्यावर असलेले कर्ज त्याच्या कुटुंबीयांच्या डोक्यावर कायम होते, किंबहुना सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना फेर कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या. चालू वर्षी ६४ आत्महत्याशेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढच होत असून, चालू वर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी सन २०११ (३४), २०१२ (१९), २०१३ (१५), २०१४ (४२), २०१५ (८५), २०१६ (८७) २०१७ (६४) शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्णात गेल्या सहा वर्षांत ३४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सन २०१५ ते १७ या तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याने तर अधिकच चिंता व्यक्त करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांना रोखण्यात शासनाला अपयश आले आहे.