शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शवागारात अद्यापही  ३४ मृतदेह पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:16 IST

महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे.

नाशिक : महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहर-ग्रामीण पोलिसांकडून याबाबत अंतिम अहवाल महापालिका प्रशासनाकडे सोपविला गेला नसल्यामुळे ३४ मृतदेह शवागारात पडून असल्याचे समजते.शहरासह जिल्ह्यात अपघाती अथवा नैसर्गिकरीत्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची ओळख न पटल्यास त्यांचे मृतदेह येथील शवागारात पोलीस तपास होईपर्यंत ठेवले जातात. या बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी १४ दिवसांची मुदत संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिली जाते. या मुदतीत चौकशी करून ओळख पटल्यास संबंधित नातेवाइकांकडे मृतदेह सोपवावे अन्यथा तसा अहवाल महापालिका प्रशासनाकडे द्यावा, अशी याबाबत शासकीय व्यवस्था आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बेवारस मृतदेहांच्या चौकशीपासून सगळ्याच बाबतीत उदासीन भूमिका शहर व ग्रामीण पोलिसांनी घेतल्यामुळे दुर्दैवी अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू पावलेल्या बेवारस, अनोळखी देहांचा अंत्यसंस्काराचा मार्ग खुला होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात एकूण ५६ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे; मात्र  त्यापैकी काही कप्पे नादुरुस्त यंत्रणेमुळे वापरात आणणे प्रशासनाला शक्य होत नाही. रुग्णालयाकडून शवागाराच्या देखभाल दुरुस्तीकडे फारसे लक्ष पुरविले जात नाही. त्यामुळे शवागृहाची क्षमता संपुष्टात आली आहे. सध्या शवागारातील मृतदेहांची संख्या ३४वर पोहचली असून, यामध्ये बहुतांश देह कुजलेल्या अवस्थेपर्यंत पोहचले असून त्यांना दुर्गंधी सुटली आहे.पावसाळ्यात परिसरात रुग्णालयातूनच साथीचे आजार पसरण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे. बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लवकरात लवकर लावली न गेल्यास जिल्हा रुग्णालयातील वातावरण रोगट होऊन इतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यास विलंब होण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.मृतदेहांच्या हेळसांडचे गांभीर्य नाही३४ मृतदेहांपैकी बहुतांश कुजलेल्या अवस्थेत आहेत. एक मृतदेह २२५ दिवसांपासून पडून आहे, तर दोन मृतदेह २०० दिवसांपासून आणि आठ ते दहा मृतदेह १५० दिवसांपासून पडून आहेत. यावरून पोलिसांकडून बेवारस मृतदेहांबाबत किती गांभीर्याने चौकशी केली जाते हे स्पष्ट होते. मृतदेहांची हेळसांड संबंधित पोलीस प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे. २० मृतदेह शहर व १४ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका