शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मिती क्षमतेत ३२८० मेगावॉटची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:26 IST

महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे.

नाशिक : महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या चार वर्षांच्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाठक यांनी सांगितले की, कंपनीने ५० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प व ३२३० मेगावॉटचे औष्णिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यामुळे राज्यातील विजेची उपलब्धता वाढली आहे. दिवाळीत पाचशे ते साडेपाचशे मेगावॉटची तूट निर्माण झाल्याने काही काळ भारनियमन करावे लागले. परंतु आता वाढविलेली वीजनिर्मिती आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्यांशी केलेल्या करारामुळे विजेसाठी राज्य स्वयंपूर्ण बनल्याचे पाठक म्हणाले. सद्यपरिस्थितीत राज्यात सर्व भागात अखंडित वीजपुरवठा सुरू असून, कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  गेल्या २२ आॅक्टोबर रोजी तब्बल २४,९३२ मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्णातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी उपयोजना क्षेत्रात १३२ केव्ही, धारणी उपकेंद्र तसेच नेपानगर ते धारणी अशी ६० किमीची आंतरराज्य वाहिनीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या भागातील १५२ गावांतील सुमारे १२००० गावकऱ्यांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असल्याचा दावाही पाठक यांनी केला.१ हजार दिवसांत १४ हजार गावात वीजज्या गावात वीज पोहचलेली नाही अशा गावांमध्ये वीज जोडणी देण्यासाठीची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार १८ हजार गावांमध्ये वीज पोहचविण्याचे उद्दिष्ट असून, केवळ १ हजार दिवसांत १४ हजार गावांमध्ये वीज पोहचली आहे. येत्या जानेवारीपर्यंत उर्वरित गावांमध्येदेखील वीज पोहोचेल असेही पाठक यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार आणि गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात अद्याप वीज पोहोचलेली नाही. तेथेही कामे लवकर सुरू होणार आहेत.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक