शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदीमुळे बेरोजगारीची कुºहाड उद्योजक संकटात : नाशकात तीन हजार कुटुंबांना उपासमारीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:00 IST

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली.

ठळक मुद्देशेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली. मात्र, प्लास्टिकच्या निर्मितीत रोजगार असणाऱ्या हजारो कामगारांची यामुळे उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक औद्योगित क्षेत्रात सुमारे तीन हजार कुटुंबांना या उद्योगामधून रोजगार मिळत असून प्लास्टीकबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रोजगार संकटात येण्याबरोबर शेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार असल्याने दुधासोबतच अन्नधान्य, फळे, भाज्यांसारख्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्येही प्लास्टिक वापरास मुभा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यात अडीच हजारांहून अधिक प्लास्टिक बॅग उत्पादक आहेत. त्यांच्याद्वारे ८० हजारांहून जास्त नागरिकांना थेट रोजगार मिळतो. यापैकी नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लास्टिक बॅग उत्पादक नाशिकमध्ये आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग तयार करतात. प्लास्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघुउद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० कोटीं रुपयांच्या प्लास्टीक बॅगचे उत्पादन होते. तर बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लास्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल होते. त्यामुळे विविध उद्योजकांचे जवळपास ८०० ते ९०० कोटी रुपये सद्यस्थितीला या व्यवसायात अडकून पडलेले आहेत. प्लास्टिकबंदीमुळे हा व्यवसाय धोक्यात आला असून हा पैसाही बुडीतात जाण्याची भिती व्यावसायिकांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वत:च्या यंत्रणा राबवून प्लास्टिकचे संकलन व पुनर्प्रक्रिया करून प्लास्टिक बॅग तयार करण्याची तयारी उद्योजकांनी दाखवली आहे. बदलत्या परिस्थितीत शेतीक्षेत्राचेही प्लास्टिक पिशव्यावरील अवलंबित्व वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वाहतूक होणारा शेतमाल याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जात असतो. या पिशव्या पारदर्शी असल्याने व्यापारी आणि शेतकºयांमध्ये सहज व्यवहार होऊन मालाचे नुकसान टळते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा वापर करतात. कंपोस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या पिशव्या पारदर्शक नसल्याने व वजन क्षमता कमी असल्याने उपयोगात येत नाही. तसेच ठिबक सिंचनसाठी वाफ्यावर पसरण्यासाठी प्लास्टिकचा मल्चिंग पेपर वापला जात असून, असे प्लास्टिक बंद झाल्याने शेती क्षेत्रालाही या प्लास्टिकबंदीचा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे..