शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

प्लास्टिकबंदीमुळे बेरोजगारीची कुºहाड उद्योजक संकटात : नाशकात तीन हजार कुटुंबांना उपासमारीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:00 IST

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली.

ठळक मुद्देशेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली. मात्र, प्लास्टिकच्या निर्मितीत रोजगार असणाऱ्या हजारो कामगारांची यामुळे उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक औद्योगित क्षेत्रात सुमारे तीन हजार कुटुंबांना या उद्योगामधून रोजगार मिळत असून प्लास्टीकबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रोजगार संकटात येण्याबरोबर शेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार असल्याने दुधासोबतच अन्नधान्य, फळे, भाज्यांसारख्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्येही प्लास्टिक वापरास मुभा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यात अडीच हजारांहून अधिक प्लास्टिक बॅग उत्पादक आहेत. त्यांच्याद्वारे ८० हजारांहून जास्त नागरिकांना थेट रोजगार मिळतो. यापैकी नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लास्टिक बॅग उत्पादक नाशिकमध्ये आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग तयार करतात. प्लास्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघुउद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० कोटीं रुपयांच्या प्लास्टीक बॅगचे उत्पादन होते. तर बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लास्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल होते. त्यामुळे विविध उद्योजकांचे जवळपास ८०० ते ९०० कोटी रुपये सद्यस्थितीला या व्यवसायात अडकून पडलेले आहेत. प्लास्टिकबंदीमुळे हा व्यवसाय धोक्यात आला असून हा पैसाही बुडीतात जाण्याची भिती व्यावसायिकांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वत:च्या यंत्रणा राबवून प्लास्टिकचे संकलन व पुनर्प्रक्रिया करून प्लास्टिक बॅग तयार करण्याची तयारी उद्योजकांनी दाखवली आहे. बदलत्या परिस्थितीत शेतीक्षेत्राचेही प्लास्टिक पिशव्यावरील अवलंबित्व वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वाहतूक होणारा शेतमाल याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जात असतो. या पिशव्या पारदर्शी असल्याने व्यापारी आणि शेतकºयांमध्ये सहज व्यवहार होऊन मालाचे नुकसान टळते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा वापर करतात. कंपोस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या पिशव्या पारदर्शक नसल्याने व वजन क्षमता कमी असल्याने उपयोगात येत नाही. तसेच ठिबक सिंचनसाठी वाफ्यावर पसरण्यासाठी प्लास्टिकचा मल्चिंग पेपर वापला जात असून, असे प्लास्टिक बंद झाल्याने शेती क्षेत्रालाही या प्लास्टिकबंदीचा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे..