शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
5
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
6
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
9
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
10
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
11
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
12
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
13
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
14
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
15
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
16
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
17
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
18
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
19
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
20
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

प्लास्टिकबंदीमुळे बेरोजगारीची कुºहाड उद्योजक संकटात : नाशकात तीन हजार कुटुंबांना उपासमारीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:00 IST

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली.

ठळक मुद्देशेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली. मात्र, प्लास्टिकच्या निर्मितीत रोजगार असणाऱ्या हजारो कामगारांची यामुळे उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक औद्योगित क्षेत्रात सुमारे तीन हजार कुटुंबांना या उद्योगामधून रोजगार मिळत असून प्लास्टीकबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रोजगार संकटात येण्याबरोबर शेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार असल्याने दुधासोबतच अन्नधान्य, फळे, भाज्यांसारख्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्येही प्लास्टिक वापरास मुभा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यात अडीच हजारांहून अधिक प्लास्टिक बॅग उत्पादक आहेत. त्यांच्याद्वारे ८० हजारांहून जास्त नागरिकांना थेट रोजगार मिळतो. यापैकी नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लास्टिक बॅग उत्पादक नाशिकमध्ये आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग तयार करतात. प्लास्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघुउद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० कोटीं रुपयांच्या प्लास्टीक बॅगचे उत्पादन होते. तर बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लास्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल होते. त्यामुळे विविध उद्योजकांचे जवळपास ८०० ते ९०० कोटी रुपये सद्यस्थितीला या व्यवसायात अडकून पडलेले आहेत. प्लास्टिकबंदीमुळे हा व्यवसाय धोक्यात आला असून हा पैसाही बुडीतात जाण्याची भिती व्यावसायिकांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वत:च्या यंत्रणा राबवून प्लास्टिकचे संकलन व पुनर्प्रक्रिया करून प्लास्टिक बॅग तयार करण्याची तयारी उद्योजकांनी दाखवली आहे. बदलत्या परिस्थितीत शेतीक्षेत्राचेही प्लास्टिक पिशव्यावरील अवलंबित्व वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वाहतूक होणारा शेतमाल याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जात असतो. या पिशव्या पारदर्शी असल्याने व्यापारी आणि शेतकºयांमध्ये सहज व्यवहार होऊन मालाचे नुकसान टळते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा वापर करतात. कंपोस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या पिशव्या पारदर्शक नसल्याने व वजन क्षमता कमी असल्याने उपयोगात येत नाही. तसेच ठिबक सिंचनसाठी वाफ्यावर पसरण्यासाठी प्लास्टिकचा मल्चिंग पेपर वापला जात असून, असे प्लास्टिक बंद झाल्याने शेती क्षेत्रालाही या प्लास्टिकबंदीचा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे..