शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

प्लास्टिकबंदीमुळे बेरोजगारीची कुºहाड उद्योजक संकटात : नाशकात तीन हजार कुटुंबांना उपासमारीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:00 IST

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली.

ठळक मुद्देशेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली. मात्र, प्लास्टिकच्या निर्मितीत रोजगार असणाऱ्या हजारो कामगारांची यामुळे उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक औद्योगित क्षेत्रात सुमारे तीन हजार कुटुंबांना या उद्योगामधून रोजगार मिळत असून प्लास्टीकबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रोजगार संकटात येण्याबरोबर शेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार असल्याने दुधासोबतच अन्नधान्य, फळे, भाज्यांसारख्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्येही प्लास्टिक वापरास मुभा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यात अडीच हजारांहून अधिक प्लास्टिक बॅग उत्पादक आहेत. त्यांच्याद्वारे ८० हजारांहून जास्त नागरिकांना थेट रोजगार मिळतो. यापैकी नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लास्टिक बॅग उत्पादक नाशिकमध्ये आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग तयार करतात. प्लास्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघुउद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० कोटीं रुपयांच्या प्लास्टीक बॅगचे उत्पादन होते. तर बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लास्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल होते. त्यामुळे विविध उद्योजकांचे जवळपास ८०० ते ९०० कोटी रुपये सद्यस्थितीला या व्यवसायात अडकून पडलेले आहेत. प्लास्टिकबंदीमुळे हा व्यवसाय धोक्यात आला असून हा पैसाही बुडीतात जाण्याची भिती व्यावसायिकांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वत:च्या यंत्रणा राबवून प्लास्टिकचे संकलन व पुनर्प्रक्रिया करून प्लास्टिक बॅग तयार करण्याची तयारी उद्योजकांनी दाखवली आहे. बदलत्या परिस्थितीत शेतीक्षेत्राचेही प्लास्टिक पिशव्यावरील अवलंबित्व वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वाहतूक होणारा शेतमाल याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जात असतो. या पिशव्या पारदर्शी असल्याने व्यापारी आणि शेतकºयांमध्ये सहज व्यवहार होऊन मालाचे नुकसान टळते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा वापर करतात. कंपोस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या पिशव्या पारदर्शक नसल्याने व वजन क्षमता कमी असल्याने उपयोगात येत नाही. तसेच ठिबक सिंचनसाठी वाफ्यावर पसरण्यासाठी प्लास्टिकचा मल्चिंग पेपर वापला जात असून, असे प्लास्टिक बंद झाल्याने शेती क्षेत्रालाही या प्लास्टिकबंदीचा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे..