शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:01 IST

:संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे. दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही.

नाशिक :संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे.दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही. अन्यत्र मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. इगतपुरीत गेल्या चोवीस तासांत १२६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि भावली या धरणांचा जलसाठा वाढत आहे. दारणामधून आज सकाळी सहा वाजता १६ हजार ५९८ तर भावलीमधून १ हजार २१८ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाºयातूनदेखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत एकूण ४४१ मिमी इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ तर अंबोलीत ९२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ४७७ दलघफूपर्यंत नव्याने पाण्याची आवक गंगापूर धरणात होऊन धरण ७४.३५ टक्के भरले. या समूहातील कश्यपी ४८ तर गौतमी गोदावरी ५८ टक्के भरले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेचशुक्र वारपासून नाशिक शहरातदेखील मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात संततधार सुरू होती. गेल्या चोवीस तासांत शहरात १७ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला.पाणीकपात रद्दबाबत आज निर्णय शक्यगंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने गेल्या ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो त्याठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला असून, संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. महापौर रंजना भानसी यांनी गंगापूर धरणासाठी साठा ८० टक्के झाल्यानंतर पाणीकपात रद्द करू, असे जाहीर केले होते. आता जवळपास ८० टक्के साठा होईल, अशी स्थिती आहे. सोमवारी (दि.२९) याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे आढावा बैठक होणार असून, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसgangapur damगंगापूर धरण