शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:01 IST

:संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे. दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही.

नाशिक :संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे.दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही. अन्यत्र मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. इगतपुरीत गेल्या चोवीस तासांत १२६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि भावली या धरणांचा जलसाठा वाढत आहे. दारणामधून आज सकाळी सहा वाजता १६ हजार ५९८ तर भावलीमधून १ हजार २१८ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाºयातूनदेखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत एकूण ४४१ मिमी इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ तर अंबोलीत ९२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ४७७ दलघफूपर्यंत नव्याने पाण्याची आवक गंगापूर धरणात होऊन धरण ७४.३५ टक्के भरले. या समूहातील कश्यपी ४८ तर गौतमी गोदावरी ५८ टक्के भरले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेचशुक्र वारपासून नाशिक शहरातदेखील मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात संततधार सुरू होती. गेल्या चोवीस तासांत शहरात १७ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला.पाणीकपात रद्दबाबत आज निर्णय शक्यगंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने गेल्या ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो त्याठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला असून, संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. महापौर रंजना भानसी यांनी गंगापूर धरणासाठी साठा ८० टक्के झाल्यानंतर पाणीकपात रद्द करू, असे जाहीर केले होते. आता जवळपास ८० टक्के साठा होईल, अशी स्थिती आहे. सोमवारी (दि.२९) याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे आढावा बैठक होणार असून, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसgangapur damगंगापूर धरण