शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:01 IST

:संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे. दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही.

नाशिक :संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे.दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही. अन्यत्र मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. इगतपुरीत गेल्या चोवीस तासांत १२६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि भावली या धरणांचा जलसाठा वाढत आहे. दारणामधून आज सकाळी सहा वाजता १६ हजार ५९८ तर भावलीमधून १ हजार २१८ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाºयातूनदेखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत एकूण ४४१ मिमी इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ तर अंबोलीत ९२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ४७७ दलघफूपर्यंत नव्याने पाण्याची आवक गंगापूर धरणात होऊन धरण ७४.३५ टक्के भरले. या समूहातील कश्यपी ४८ तर गौतमी गोदावरी ५८ टक्के भरले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेचशुक्र वारपासून नाशिक शहरातदेखील मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात संततधार सुरू होती. गेल्या चोवीस तासांत शहरात १७ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला.पाणीकपात रद्दबाबत आज निर्णय शक्यगंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने गेल्या ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो त्याठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला असून, संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. महापौर रंजना भानसी यांनी गंगापूर धरणासाठी साठा ८० टक्के झाल्यानंतर पाणीकपात रद्द करू, असे जाहीर केले होते. आता जवळपास ८० टक्के साठा होईल, अशी स्थिती आहे. सोमवारी (दि.२९) याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे आढावा बैठक होणार असून, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसgangapur damगंगापूर धरण