शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अडीच एकरमध्ये घेतले २५ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: September 8, 2016 00:44 IST

प्रगतिशील : गारपीट, दुष्काळावर मात करत तंत्रज्ञानाने साधला समतोल

खामखेडा : येथील शेतकऱ्याने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल साधत तीन वर्षांपासूनचे दुष्काळाचे चटके सोसत, अल्पपाण्यावर अडीच एकर शेतीमध्ये हिरव्या मिरचीचं भरघोस उत्पन्न घेत तब्बल पंचवीस लाखांचं उत्पन्न घेत आदर्श निर्माण केला आहे.गारपीट, अवकाळी पाऊस व तीव्र दुष्काळ अशा दुष्टचक्रात पारंपरिक शेतीमधील उत्पादनात घट होत भांडवल निघत नसताना, मोकळ्या शेतात मल्चिंग पेपरचा वापर न करता येथील अशोक अहिरे यांनी आपल्या अडीच एकर शेतीमध्ये पंचवीस लाख रुपयांचे हिरव्या मिरचीचं उत्पादन घेतलंय. कमी पाण्यात इनलाइन सिंचन पद्धतीवर येणारं पीक म्हणून अहिरे यांनी हिरव्या मिरचीचा निवडलेला पर्याय, कमी कालावधीत मिळवलेले उत्पादन जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.कसमादे परिसरातील देवळा भागात मागील तीन वर्षात गारपीट, अवकाळी पाऊस व नंतर तीव्र दुष्काळ अशी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांची कसोटी पाहिली. या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील भांडवलही सुटले नाही. अशा काळात अहिरे यांनी या वर्षी बाजारभावाचा अभ्यास करून हिरव्या मिरचीच्या पिकाची निवड केली.नाशिक येथील एका नर्सरीतून पंचवीस हजार रोपं आणली. ड्रिपच्या जोडणीवर मिल्चिंगचा वापर न करता मिरचीची लागवड केली. रोपं, खते, मजुरी असा सर्व एकत्रित पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत हा खर्च आल्याचं सांगितले. आतापर्यंत त्यांनी तब्बल पन्नास टन मिरचीची विक्री स्थानिक बाजारात तसेच धुळे, जळगाव, नवापूर, मुंबई अशा बाजारात केली. त्यांच्या मिरचीला सरासरी रुपये ६० ते ६५ रुपये भाव मिळाला. सर्वाधिक ८० रुपये किलोने त्यांनी मिरची विकली. या मिरचीतून पन्नास टनाचे त्यांना जवळपास पंचवीस लाखाहून अधिक पैसे मिळालेत. आणखी पाच सहा टन उत्पादन निघेल, अशी आशा आहे. बाजारभाव पडले नाहीत तर अजूनही उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी तीव्र दुष्काळामुळे मिरचीच्या घेतलेल्या उत्पादनामुळे हंगामभर मिरची तेजीत असल्याने अहेर यांना हिरव्या मिरचीने मालामाल केले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल कसा टिकून राहतो याचं उदाहरण अशोक अहिरे यांनी घालून दिलंय. (वार्ताहर)