शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरमध्ये घेतले २५ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: September 8, 2016 00:44 IST

प्रगतिशील : गारपीट, दुष्काळावर मात करत तंत्रज्ञानाने साधला समतोल

खामखेडा : येथील शेतकऱ्याने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल साधत तीन वर्षांपासूनचे दुष्काळाचे चटके सोसत, अल्पपाण्यावर अडीच एकर शेतीमध्ये हिरव्या मिरचीचं भरघोस उत्पन्न घेत तब्बल पंचवीस लाखांचं उत्पन्न घेत आदर्श निर्माण केला आहे.गारपीट, अवकाळी पाऊस व तीव्र दुष्काळ अशा दुष्टचक्रात पारंपरिक शेतीमधील उत्पादनात घट होत भांडवल निघत नसताना, मोकळ्या शेतात मल्चिंग पेपरचा वापर न करता येथील अशोक अहिरे यांनी आपल्या अडीच एकर शेतीमध्ये पंचवीस लाख रुपयांचे हिरव्या मिरचीचं उत्पादन घेतलंय. कमी पाण्यात इनलाइन सिंचन पद्धतीवर येणारं पीक म्हणून अहिरे यांनी हिरव्या मिरचीचा निवडलेला पर्याय, कमी कालावधीत मिळवलेले उत्पादन जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.कसमादे परिसरातील देवळा भागात मागील तीन वर्षात गारपीट, अवकाळी पाऊस व नंतर तीव्र दुष्काळ अशी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांची कसोटी पाहिली. या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील भांडवलही सुटले नाही. अशा काळात अहिरे यांनी या वर्षी बाजारभावाचा अभ्यास करून हिरव्या मिरचीच्या पिकाची निवड केली.नाशिक येथील एका नर्सरीतून पंचवीस हजार रोपं आणली. ड्रिपच्या जोडणीवर मिल्चिंगचा वापर न करता मिरचीची लागवड केली. रोपं, खते, मजुरी असा सर्व एकत्रित पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत हा खर्च आल्याचं सांगितले. आतापर्यंत त्यांनी तब्बल पन्नास टन मिरचीची विक्री स्थानिक बाजारात तसेच धुळे, जळगाव, नवापूर, मुंबई अशा बाजारात केली. त्यांच्या मिरचीला सरासरी रुपये ६० ते ६५ रुपये भाव मिळाला. सर्वाधिक ८० रुपये किलोने त्यांनी मिरची विकली. या मिरचीतून पन्नास टनाचे त्यांना जवळपास पंचवीस लाखाहून अधिक पैसे मिळालेत. आणखी पाच सहा टन उत्पादन निघेल, अशी आशा आहे. बाजारभाव पडले नाहीत तर अजूनही उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी तीव्र दुष्काळामुळे मिरचीच्या घेतलेल्या उत्पादनामुळे हंगामभर मिरची तेजीत असल्याने अहेर यांना हिरव्या मिरचीने मालामाल केले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल कसा टिकून राहतो याचं उदाहरण अशोक अहिरे यांनी घालून दिलंय. (वार्ताहर)