शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:32 IST

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, पंथ असा भेदभाव जाणवला नाहीम्हणून भारताची प्रतिमा मलिनअनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता

नाशिक : सायकलवरुन ३१ देशांच्या भ्रमंतीसाठी सायकलवरुन निघालो असताना जगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, भाषा, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव जाणवला नाही तर माणुसकीच श्रेष्ठ असल्याचा अनुभव मला आला. या सहाशे दिवसांच्या सायकलभ्रमंतीमध्ये मला सच्चा माणूस जागोजागी भेटला. ही भ्रमंती थरारक जरी असली तरी माझ्या आंतरबाह्य बदलाची साक्षीदारही आहे, असे २४ हजार किलोमीटरचे अंतर सायकलवरुन पुर्ण करणाऱ्या देवळाली गावातील योगेश गुप्ता यांनी सांगितले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, निता नारंग, विनायक रानडे, जयेश आपटे, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहशे दिवसांची सायकलभ्रमंती व त्यामध्ये आलेले अनुभव याबाबत संवादक अपर्णा क्षेमकल्याणी यांनी योगेश गुप्ता यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुप्ता म्हणाले, सायकलवर तंबू, स्लिपिंग बॅग, दोन जोडी कपडे व सायकल दुरु स्तीचे सामान घेऊन घराबाहेर पडलो. खरे जीवन अनुभवण्याकरिता महामार्गाची निवड न करता आडवाटेचा मार्ग निवडला. सर्वच ठिकाणी स्थानिकांचे खूप सहकार्य मिळाले तसेच आपुलकीमुळे माझा प्रवास सोपा झाला आणि एक वेगळीच अनुभूती मिळाली. कोणत्याही देशातील सामान्य नागरिकांना युद्ध नको असल्याचे सांगताना अनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता पहावयास मिळाल्याचे गुप्ता यांनी आवर्जून यावेळी नमुद केले.-इन्फो-...म्हणून भारताची प्रतिमा मलिनइराणचे नागरिक अत्यंत स्वागतशील असून तेथे भेटलेल्या एका व्यक्तीने तर चक्क त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मागणी घातली आणि ते बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक देशांमध्ये आजही जुने हिंदी चित्रपटांची गीते लोकिप्रय आहेत. माध्यमांतून येणाºया भारतातील हिंसाचार, बलात्कार, असुरक्षितता, अस्वच्छता, जातीय तेढ आदि बातम्यांमुळे भारताची प्रतिमा विदेशात जनसामान्यात नकारात्मक होत असल्याची खंत त्यांनी अनुभव सांगताना व्यक्त केली.

टॅग्स :Travelप्रवासNashikनाशिक