शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:32 IST

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, पंथ असा भेदभाव जाणवला नाहीम्हणून भारताची प्रतिमा मलिनअनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता

नाशिक : सायकलवरुन ३१ देशांच्या भ्रमंतीसाठी सायकलवरुन निघालो असताना जगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, भाषा, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव जाणवला नाही तर माणुसकीच श्रेष्ठ असल्याचा अनुभव मला आला. या सहाशे दिवसांच्या सायकलभ्रमंतीमध्ये मला सच्चा माणूस जागोजागी भेटला. ही भ्रमंती थरारक जरी असली तरी माझ्या आंतरबाह्य बदलाची साक्षीदारही आहे, असे २४ हजार किलोमीटरचे अंतर सायकलवरुन पुर्ण करणाऱ्या देवळाली गावातील योगेश गुप्ता यांनी सांगितले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, निता नारंग, विनायक रानडे, जयेश आपटे, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहशे दिवसांची सायकलभ्रमंती व त्यामध्ये आलेले अनुभव याबाबत संवादक अपर्णा क्षेमकल्याणी यांनी योगेश गुप्ता यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुप्ता म्हणाले, सायकलवर तंबू, स्लिपिंग बॅग, दोन जोडी कपडे व सायकल दुरु स्तीचे सामान घेऊन घराबाहेर पडलो. खरे जीवन अनुभवण्याकरिता महामार्गाची निवड न करता आडवाटेचा मार्ग निवडला. सर्वच ठिकाणी स्थानिकांचे खूप सहकार्य मिळाले तसेच आपुलकीमुळे माझा प्रवास सोपा झाला आणि एक वेगळीच अनुभूती मिळाली. कोणत्याही देशातील सामान्य नागरिकांना युद्ध नको असल्याचे सांगताना अनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता पहावयास मिळाल्याचे गुप्ता यांनी आवर्जून यावेळी नमुद केले.-इन्फो-...म्हणून भारताची प्रतिमा मलिनइराणचे नागरिक अत्यंत स्वागतशील असून तेथे भेटलेल्या एका व्यक्तीने तर चक्क त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मागणी घातली आणि ते बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक देशांमध्ये आजही जुने हिंदी चित्रपटांची गीते लोकिप्रय आहेत. माध्यमांतून येणाºया भारतातील हिंसाचार, बलात्कार, असुरक्षितता, अस्वच्छता, जातीय तेढ आदि बातम्यांमुळे भारताची प्रतिमा विदेशात जनसामान्यात नकारात्मक होत असल्याची खंत त्यांनी अनुभव सांगताना व्यक्त केली.

टॅग्स :Travelप्रवासNashikनाशिक