शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:32 IST

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, पंथ असा भेदभाव जाणवला नाहीम्हणून भारताची प्रतिमा मलिनअनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता

नाशिक : सायकलवरुन ३१ देशांच्या भ्रमंतीसाठी सायकलवरुन निघालो असताना जगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, भाषा, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव जाणवला नाही तर माणुसकीच श्रेष्ठ असल्याचा अनुभव मला आला. या सहाशे दिवसांच्या सायकलभ्रमंतीमध्ये मला सच्चा माणूस जागोजागी भेटला. ही भ्रमंती थरारक जरी असली तरी माझ्या आंतरबाह्य बदलाची साक्षीदारही आहे, असे २४ हजार किलोमीटरचे अंतर सायकलवरुन पुर्ण करणाऱ्या देवळाली गावातील योगेश गुप्ता यांनी सांगितले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, निता नारंग, विनायक रानडे, जयेश आपटे, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहशे दिवसांची सायकलभ्रमंती व त्यामध्ये आलेले अनुभव याबाबत संवादक अपर्णा क्षेमकल्याणी यांनी योगेश गुप्ता यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुप्ता म्हणाले, सायकलवर तंबू, स्लिपिंग बॅग, दोन जोडी कपडे व सायकल दुरु स्तीचे सामान घेऊन घराबाहेर पडलो. खरे जीवन अनुभवण्याकरिता महामार्गाची निवड न करता आडवाटेचा मार्ग निवडला. सर्वच ठिकाणी स्थानिकांचे खूप सहकार्य मिळाले तसेच आपुलकीमुळे माझा प्रवास सोपा झाला आणि एक वेगळीच अनुभूती मिळाली. कोणत्याही देशातील सामान्य नागरिकांना युद्ध नको असल्याचे सांगताना अनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता पहावयास मिळाल्याचे गुप्ता यांनी आवर्जून यावेळी नमुद केले.-इन्फो-...म्हणून भारताची प्रतिमा मलिनइराणचे नागरिक अत्यंत स्वागतशील असून तेथे भेटलेल्या एका व्यक्तीने तर चक्क त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मागणी घातली आणि ते बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक देशांमध्ये आजही जुने हिंदी चित्रपटांची गीते लोकिप्रय आहेत. माध्यमांतून येणाºया भारतातील हिंसाचार, बलात्कार, असुरक्षितता, अस्वच्छता, जातीय तेढ आदि बातम्यांमुळे भारताची प्रतिमा विदेशात जनसामान्यात नकारात्मक होत असल्याची खंत त्यांनी अनुभव सांगताना व्यक्त केली.

टॅग्स :Travelप्रवासNashikनाशिक