शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: June 1, 2017 02:09 IST

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून नगरसाठी आरक्षित असलेले अखेरचे आवर्तन पूर्ण झाले असून, धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून नगरसाठी आरक्षित असलेले अखेरचे आवर्तन पूर्ण झाले असून, धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेला ३१ जुलैपर्यंत ९१६.६५ दलघफू पाणीसाठ्याची आवश्यकता भासणार आहे, मात्र गंगापूर धरण समूहातील केवळ ८३५.९० दलघफू पाण्याचेच आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे.गंगापूर धरणातून गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदर पाणी नांदूरमधमेश्वर धरणात सोडले जात असून, त्याठिकाणी डाव्या कालव्यामार्फत राहाता, तर उजव्या कालव्यामार्फत कोपरगावसाठी आवर्तन दिले जात आहे. नगरसाठी गंगापूर धरणात १ हजार दलघफू पाण्याचे आरक्षण होते. अखेरचे आवर्तन आता पूर्ण झाले असून, धरणातून आता विसर्ग होणार नसल्याचे पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले. ३१ मे २०१७ अखेर गंगापूर धरण समूहात १८११ दलघफू म्हणजे १९.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात गंगापूर धरणात १३६५ दलघफू म्हणजे २४.२५ टक्के, काश्यपीमध्ये ३७४ दलघफू म्हणजे २०.१९ टक्के, तर गौतमी धरणात ७२ दलघफू म्हणजे ३.८४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेला दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या २९२ दिवसांच्या कालावधीसाठी गंगापूर धरण समूहात ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित आहे. त्यात ३० मे २०१७ अखेरपर्यंत गंगापूर धरण समूहातील ३०६४.१० दलघफू पाण्याची उचल करण्यात आली आहे. दारणा धरणातून मात्र २२३.९७ दलघफू पाणीसाठाच महापालिकेला उचलता आलेला आहे. दारणा धरणाने आता तळ गाठला असून, केवळ ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेची आता सारी भिस्त गंगापूर धरणातील पाण्यावरच आहे. गंगापूर धरणात ८३५.९० दलघफू इतकाच आरक्षित पाणीसाठा शिल्लक असून, दारणातून १७६.०३ आरक्षित पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेमार्फत गंगापूर धरणातून सद्यस्थितीत प्रतिदिन १४.५५ दलघफू पाणी उचलले जात आहे.