शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

गंगापूर धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: June 1, 2017 02:09 IST

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून नगरसाठी आरक्षित असलेले अखेरचे आवर्तन पूर्ण झाले असून, धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून नगरसाठी आरक्षित असलेले अखेरचे आवर्तन पूर्ण झाले असून, धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेला ३१ जुलैपर्यंत ९१६.६५ दलघफू पाणीसाठ्याची आवश्यकता भासणार आहे, मात्र गंगापूर धरण समूहातील केवळ ८३५.९० दलघफू पाण्याचेच आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे.गंगापूर धरणातून गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदर पाणी नांदूरमधमेश्वर धरणात सोडले जात असून, त्याठिकाणी डाव्या कालव्यामार्फत राहाता, तर उजव्या कालव्यामार्फत कोपरगावसाठी आवर्तन दिले जात आहे. नगरसाठी गंगापूर धरणात १ हजार दलघफू पाण्याचे आरक्षण होते. अखेरचे आवर्तन आता पूर्ण झाले असून, धरणातून आता विसर्ग होणार नसल्याचे पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले. ३१ मे २०१७ अखेर गंगापूर धरण समूहात १८११ दलघफू म्हणजे १९.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात गंगापूर धरणात १३६५ दलघफू म्हणजे २४.२५ टक्के, काश्यपीमध्ये ३७४ दलघफू म्हणजे २०.१९ टक्के, तर गौतमी धरणात ७२ दलघफू म्हणजे ३.८४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेला दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या २९२ दिवसांच्या कालावधीसाठी गंगापूर धरण समूहात ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित आहे. त्यात ३० मे २०१७ अखेरपर्यंत गंगापूर धरण समूहातील ३०६४.१० दलघफू पाण्याची उचल करण्यात आली आहे. दारणा धरणातून मात्र २२३.९७ दलघफू पाणीसाठाच महापालिकेला उचलता आलेला आहे. दारणा धरणाने आता तळ गाठला असून, केवळ ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेची आता सारी भिस्त गंगापूर धरणातील पाण्यावरच आहे. गंगापूर धरणात ८३५.९० दलघफू इतकाच आरक्षित पाणीसाठा शिल्लक असून, दारणातून १७६.०३ आरक्षित पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेमार्फत गंगापूर धरणातून सद्यस्थितीत प्रतिदिन १४.५५ दलघफू पाणी उचलले जात आहे.