शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

200 हरकती; ५०० स्वाक्षऱ्या!

By admin | Updated: August 1, 2015 23:42 IST

बोगदा बंदच : सोमवारी पुन्हा भेटणार आयुक्तांना

नाशिक : इंदिरानगर ते गोविंदनगरला जोडणारा बोगदा बंद करण्याच्या पोलिसांच्या कृतीला हरकत घेण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेला, तसेच लेखी हरकतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सोमवारी शिष्टमंडळासह जाऊन पोलीस आयुक्तांना स्थानिक रहिवासी आपल्या भावना कळविणार आहेत. इंदिरानगरचा बोगदा बंद होऊन तीन आठवड्यांपेक्षाही अधिक कालावधी उलटला असून, या बोगद्याचा दररोज वापर करणाऱ्या हजारो वाहनचालकांची त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. बोगद्याला पोलिसांनी पर्याय म्हणून सुचविलेल्या मार्गाचा वापर करण्यास नागरिक अनुत्सुक असल्यामुळे महामार्गावर अन्य ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय पाहून बोगदा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे विनंती केल्यावरही त्याला भीक घालण्यात आलेली नाही, त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळाचीही बोळवण करण्यात आली. उलटपक्षी पोलिसांनी नागरिकांकडून लेखी हरकती मागवून आपली मनमानी सुरूच ठेवली. त्यामुळे इंदिरानगरवासीयांनी पोलिसांच्या कृतीविरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबविली असून, आजपावेतो सुमारे पाचशे नागरिकांनी स्वत:हून निवेदनावर स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शविला आहे, तर नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी आपल्या संपर्क कार्यालयात नागरिकांकडून लेखी स्वरूपाच्या हरकती मागविल्या असता त्यालाही चांगला प्रतिसाद मिळून दोनशेहून अधिक नागरिकांनी आपली मते खुल्या प्रमाणात मांडली आहेत. सोमवारी ही सारी निवेदने घेऊन इंदिरानगरवासीय पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द करणार असून, तरीही नागरिकांच्या भावनांची दखल न घेतल्यास थेट न्यायालयातच आव्हान देण्याची तयारी केली जात आहे.(प्रतिनिधी)