शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात शिवशाहीचे २० अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:46 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आरामदायी अशा शिवशाही बसेसच्या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, नाशिक विभागातील शिवशाही बसेसचेदेखील अपघात वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. लहान, मोठ्या स्वरूपातील सुमारे २० गाड्यांचे अपघात वर्षभरात झाले असून, त्यामध्ये १२ अपघात हे गंभीर नुकसानग्रस्त असल्याची नोंद महामंडळाने केली आहे. या अपघातामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या गाड्यांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आरामदायी अशा शिवशाही बसेसच्या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, नाशिक विभागातील शिवशाही बसेसचेदेखील अपघात वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. लहान, मोठ्या स्वरूपातील सुमारे २० गाड्यांचे अपघात वर्षभरात झाले असून, त्यामध्ये १२ अपघात हे गंभीर नुकसानग्रस्त असल्याची नोंद महामंडळाने केली आहे. या अपघातामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या गाड्यांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत आहे.  राज्य परिवहन महामंडळाने लाल पिवळ्या गाड्यांची ओळख पुसण्यासाठी आरामदायी प्रवासी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. यापूर्वी निमआराम, व्हाल्वोसारख्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या होत्या.आता शिवशाही बसेस राज्याच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या असून, नाशिक विभागासाठी टप्प्याटप्प्याने ७७ शिवशाही बसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, धुळे, औरंगाबाद,  तुळजापूरसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी याबसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या मार्गावर महामंडळाने आरामदायी अशा शिवशाहीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक विभागातील शिवशाही बसेसला अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये वर्षभरात २० अपघातांची नोंद करण्यात आलेली आहे. यामध्ये एकाही प्रवाशाला इजा झालेली नाही, मात्र गाड्यांचे इतर दोघांना प्राण गमवावे लागले आहेत.  नाशिक शहरातून जाणाºया या गाड्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असून, उत्पन्नदेखील चांगले मिळत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. आरामदायी आसनव्यवस्था तसेच वातानुकूलित, वायफाय सुविधेमुळे या बसेसला मोठ्या प्रमाणात प्रवासी पसंती देतात. अर्ध्या तासाच्या अंतराने या बसेस उपलब्ध असल्यामुळे, तर प्रवाशंची सोय झाली आहे. त्यामुळे या बसेसची दैनंदिन मागणी वाढतच आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAccidentअपघात