शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

२५०० कोटींपैकी १५७ कोटींची पीककर्ज वसुली

By admin | Updated: April 25, 2017 02:11 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एकूण वाटप केलेल्या २७९४ कोटींच्या कर्जापैकी २५३४ कोेटींचे पीककर्ज वाटप केले

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एकूण वाटप केलेल्या २७९४ कोटींच्या कर्जापैकी २५३४ कोेटींचे पीककर्ज वाटप केले असून, त्यापोटी अवघे १५७ कोटींचे (५.६० टक्के) कर्ज वसूल झाल्याची माहिती जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तरी त्यांनी भरलेली पीक कर्जाची रक्कम त्यांना परत केली जाईल. मात्र तूर्तास पीक कर्जाची थकबाकी भरून बॅँकेची आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी थकबाकीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, जिल्हा बॅँकेत शिक्षकांच्या वेतनापोटी जिल्हा परिषदेकडून वर्ग झालेली ८५ कोटी ३५ लाखांची रक्कम स्टेट बॅँक आॅफ इंडियामध्ये चालू खात्यात जमा केली आहे. त्यातील ४३ कोटी जिल्ह्णातील संबंधित तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये टी.टी.द्वारे वर्ग केली आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे शिक्षकांना त्यांचे वेतन मिळत नसल्याचा दावा नरेंद्र दराडे यांनी केला आहे. जिल्हा बॅँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माणिकराव कोकाटे, परवेज कोकणी, गणपतराव पाटील, धनंजय पवार आदी उपस्थित होते. त्यांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक अडचणींबाबत माहिती दिली. १९९२ सालापासून शिक्षकांच्या वेतनापोटींचा सेवा कर जिल्हा बॅँक घेत नसल्याने सुमारे १८ ते २० कोटींचे यापोटी येणे सरकारकडे आहे. मात्र शिक्षकांनी वेतन मिळत नसल्याचे कारण देत जिल्हा बॅँकेसमोर वारंवार निदर्शने आणि ठिय्या आांदोलन केल्याने जिल्हा बॅँकेची बदनामी झाल्याने यापुढे शिक्षकांकडून त्यांच्या वेतनापोटींचा सेवाकर आकारण्याचा निर्णय जिल्हा बॅँकेने घेतल्याचा दावा संचालक माणिकराव कोकाटे यांनी केला. शिक्षकांच्या वेतनाची रक्कम यापूर्वीच स्टेट बॅँक आॅफ इंडियात जमा केलेली असल्याने आणि स्टेट बॅँकेकडे चलन तुटवडा असल्याने रोख पैसे मिळत नसल्याचे संचालक शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. बॅँकेच्या आजमितीस ३१२१ कोटींच्या ठेवी असून, ९४५ कोटींची गुंतवणूक बॅँकेने नाबार्डच्या निर्देशानुसार केलेली आहे.३४१ कोटींच्या नोटा न स्वीकारल्याने आणि शिखरबॅँकेकडून वेळेवर कर्जाची रक्कम उपलब्ध होत नसल्यानेच बॅँकेची आर्थिक कोंडी झाल्याचा दावा संचालक परवेज कोकणी यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी केल्यानेच राज्यातील शेतकरी त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्णातील शेतकरी पीककर्जाची परतफेड करीत नसल्याने सुमारे दोन हजारांहून अधिक कोटींचे पीककर्ज थकल्याचा दावा संचालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)