शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

नाशकात दरमहा १५० गायींचा टळतो मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:00 IST

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते.

नाशिक : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते. गोवंश वाचविण्यासाठी अशाप्रकारचे विशेष मोहीम राबविल्यास अनेक गायींची सुटका होऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.  नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या इतर राज्यांच्या सीमा आणि अनधिकृत कत्तलखान्यांचा आंतरराज्यीय व्यवसाय यामुळे नाशिकमध्ये अनेकदा कत्तलीसाठी जनावरे आणली जात असल्याचा संशय व्यक्त होतो. नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषांवर तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास अनेकदा कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची पोलिसांनी सुटका केलेली आहे. साधारणपणे महिनाभरात राबविण्यात येणाºया चार-पाच विशेष कारवायांमध्ये किमान १५० ते १७० जनावरांची सुटका केली जाते. पकडलेली जनावरे ही शहरातील तीन ते चार महत्त्वाच्या गोसेवा केंद्रांकडे सुपूर्द केली जातात. एका गोसेवा केंद्राकडे महिनाभरात किमान ३० ते ४० गायी पोलिसांकडून सुपुर्द केल्या जातात. पोलिसांच्या कारवाई आढळून आलेल्या जनावरांची माहिती नोंद केली जाते.  पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करण्यात आल्यानंतर या मोहिमेत कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन आढळल्यास कारवाई होते. गोवंश हत्या रोखण्यासाठीची विशेष मोहीम राबविण्यास आल्यास मोठ्या प्रमाणात गायींचा जीव वाचू शकतो. अनेकदा खबºयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई केली जाते. यामुळेदेखील अनेक गायींना जीवदान मिळते. महाराष्टÑात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू असतानाही राज्यभरात अनेक ठिकाणी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाताना पकडण्यात येतात. मात्र त्या तुलनेत संबंधितावरील कारवाई उघड होत नसल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे बोलले जाते.गोशाळांवर येतो ताणपोलिसांनी पकडलेली जनावरे ही शहरातील काही ठराविक गोशाळांकडे सोपविली जातात. त्यामुळे गोशाळांमध्ये जनावरांची संख्या वाढली जाते. या जनावरांच्या पालनपोषणासाठी शासनपातळीवर कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि दानशूरदेखील गोधनासाठी गोखाद्य देत नसल्यामुळे गोशाळांपुढे गोपालनाचा मोठा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे कित्येकदा गोशाळाचालकांना दात्यांचा शोध घ्यावा लागतो किंवा नागरिकांना आवाहन तरी करावे लागते.

टॅग्स :cowगायNashikनाशिक