शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

नाशकात दरमहा १५० गायींचा टळतो मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:00 IST

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते.

नाशिक : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते. गोवंश वाचविण्यासाठी अशाप्रकारचे विशेष मोहीम राबविल्यास अनेक गायींची सुटका होऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.  नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या इतर राज्यांच्या सीमा आणि अनधिकृत कत्तलखान्यांचा आंतरराज्यीय व्यवसाय यामुळे नाशिकमध्ये अनेकदा कत्तलीसाठी जनावरे आणली जात असल्याचा संशय व्यक्त होतो. नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषांवर तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास अनेकदा कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची पोलिसांनी सुटका केलेली आहे. साधारणपणे महिनाभरात राबविण्यात येणाºया चार-पाच विशेष कारवायांमध्ये किमान १५० ते १७० जनावरांची सुटका केली जाते. पकडलेली जनावरे ही शहरातील तीन ते चार महत्त्वाच्या गोसेवा केंद्रांकडे सुपूर्द केली जातात. एका गोसेवा केंद्राकडे महिनाभरात किमान ३० ते ४० गायी पोलिसांकडून सुपुर्द केल्या जातात. पोलिसांच्या कारवाई आढळून आलेल्या जनावरांची माहिती नोंद केली जाते.  पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करण्यात आल्यानंतर या मोहिमेत कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन आढळल्यास कारवाई होते. गोवंश हत्या रोखण्यासाठीची विशेष मोहीम राबविण्यास आल्यास मोठ्या प्रमाणात गायींचा जीव वाचू शकतो. अनेकदा खबºयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई केली जाते. यामुळेदेखील अनेक गायींना जीवदान मिळते. महाराष्टÑात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू असतानाही राज्यभरात अनेक ठिकाणी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाताना पकडण्यात येतात. मात्र त्या तुलनेत संबंधितावरील कारवाई उघड होत नसल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे बोलले जाते.गोशाळांवर येतो ताणपोलिसांनी पकडलेली जनावरे ही शहरातील काही ठराविक गोशाळांकडे सोपविली जातात. त्यामुळे गोशाळांमध्ये जनावरांची संख्या वाढली जाते. या जनावरांच्या पालनपोषणासाठी शासनपातळीवर कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि दानशूरदेखील गोधनासाठी गोखाद्य देत नसल्यामुळे गोशाळांपुढे गोपालनाचा मोठा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे कित्येकदा गोशाळाचालकांना दात्यांचा शोध घ्यावा लागतो किंवा नागरिकांना आवाहन तरी करावे लागते.

टॅग्स :cowगायNashikनाशिक