शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

शेतकऱ्यांचे १५ लाख थकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:24 IST

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये खळबळबाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या

येवला : कांदा उत्पादकांचा संताप, शुक्र वारपासून आमरण उपोषण 

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील या कांदा व्यापाºयाकडे फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल परिसरातील शेतकºयांनी कांदा विक्री केला होता. या व्यापाºयाने मालाचे पैसे रोख न देता ५० शेतकºयांना धनादेशाद्वारे पेमेंट अदा केले होते. मार्च महिना अखेर सबंधित शेतकºयांचे धनादेश न वटल्यामुळे त्यांनी कांदा व्यापाºयाकडे धाव घेतल्यानंतर व्यापाºयाने भेट टाळणे, अरेरावीची भाषा करणे, दबाव आणणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकººयांनी केली आहे. हा प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रश्नावर शेतकºयांनी उपोषणाचे हत्यार उपासले आहे. सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी बाजार समितीस १३ रोजी पत्र लिहून हा विषय गांभीर्याने घेण्याचे कळविले होते. तसेच १७ पर्यंत सर्व शेतकºयांचे पैसे द्यावेत. त्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. पैसे मिळावेत म्हणून शेतकºयांनी शुक्रवार २० एप्रिलपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणास संपत आहेर, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पोपट बोरसे, सखाहरी जाधव, सखाहरी दाभाडे, नामदेव कदम, दिनकर भंडारी, साहेबराव संत्रे, जगन्नाथ एंडाईत आदीसह शेतकरी बसणार आहे.सूर्यभान माधवराव गायकवाड या शेतकºयाला दिलेला धनादेश माघारी आला आहे. त्यांनी बाजार समितीसह प्रशासनाकडे तक्रार केली आहे.शेतकºयांमध्ये खळबळअंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकºयांचे सुमारे १५ लाख रु पयांचे धनादेश वटलेले नाही. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. बाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या आहेत. पैसे थकवल्यामुळे त्या दोन व्यापाºयांचा परवानादेखील रद्द केला आहे. शिवाय येवला सहायक निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांनी याबाबत विचारणा केली आहे. बाजार समिती आता शेतकºयांचे पेमेंट रोखीने देत आहे. रोख पेमेंट सुरु झाल्यामुळे आता पैसे थकवण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही. सुमारे ५५० कोटी रु पये रक्कम कांदा उत्पादक शेतकºयांना रोख देण्यात आले आहे. सुमारे अर्धा टक्का रक्कम थकली हे मान्य आहे. ३० एप्रिलपर्यंत पेमेंट देण्याचे त्या दोन व्यापाºयांनी कबूल केले आहे.उषाताई शिंदे, सभापती, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती शेतमाल विक्र ीवर कमिशन घेते. त्यामुळे पैसे देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परवानाधारक व्यापाºयाकडून बँक सॉलव्हन्सी, सातबारा उताºयावर बाजार समितीचे नाव लावून घेण्याची जिल्ह्यातील अन्य सात बाजार समितीमधील पद्धत येवला बाजार समितीने अवलंबावी.दीपक पाटोदकर,सामाजिक कार्यकर्ता