शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जिल्हा परिषदेत निघाला १५ पोते कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:14 IST

संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या पहिल्याच दिवशी वास्तवाचे दर्शन

नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेत सहभागी होत अभियानाचा शुभारंभ केला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह सर्व खातेप्रमुख व कर्मचाºयांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होत स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल १५ पोते कचरा निघाला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्णाच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेतच रोजच्या रोज स्वच्छता होत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अन्य विभागाचेही अधिकारी जिल्हा परिषदेत रोज येताना त्यांचे या कचºयाकडे कधी लक्षच गेले नाही का असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विविध ठिकाणी भेट देऊन तेथील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा नियमित आढावा घेत असताना त्यांच्या नजरेतून रोजच्या कामाचे ठिकाण असलेली जिल्हा परिषदेची इमारत कशी चुकली? की जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेप्रमाणेच जिल्ह्णातील आरोग्यसेवेकडेही केवळ स्वच्छता अभियान आणि छायाचित्रण उत्सवांपुरतेच पाहिले जाते असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे.आरोग्याचा धोका टळलाजिल्हा परिषद इमारतीच्या आवारात साचलेल्या कचºयामुळे डासांची उत्पत्ती होऊन येथे कार्यरत कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. परंतु, सुदैवाने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छता ही अभियान’मुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीची स्वच्छता झाल्याने जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच टळला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य