शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

जिल्हा परिषदेत निघाला १५ पोते कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:14 IST

संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या पहिल्याच दिवशी वास्तवाचे दर्शन

नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेत सहभागी होत अभियानाचा शुभारंभ केला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह सर्व खातेप्रमुख व कर्मचाºयांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होत स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल १५ पोते कचरा निघाला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्णाच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेतच रोजच्या रोज स्वच्छता होत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अन्य विभागाचेही अधिकारी जिल्हा परिषदेत रोज येताना त्यांचे या कचºयाकडे कधी लक्षच गेले नाही का असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विविध ठिकाणी भेट देऊन तेथील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा नियमित आढावा घेत असताना त्यांच्या नजरेतून रोजच्या कामाचे ठिकाण असलेली जिल्हा परिषदेची इमारत कशी चुकली? की जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेप्रमाणेच जिल्ह्णातील आरोग्यसेवेकडेही केवळ स्वच्छता अभियान आणि छायाचित्रण उत्सवांपुरतेच पाहिले जाते असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे.आरोग्याचा धोका टळलाजिल्हा परिषद इमारतीच्या आवारात साचलेल्या कचºयामुळे डासांची उत्पत्ती होऊन येथे कार्यरत कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. परंतु, सुदैवाने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छता ही अभियान’मुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीची स्वच्छता झाल्याने जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच टळला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य