शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

जिल्हा परिषदेत निघाला १५ पोते कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:14 IST

संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या पहिल्याच दिवशी वास्तवाचे दर्शन

नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेत सहभागी होत अभियानाचा शुभारंभ केला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह सर्व खातेप्रमुख व कर्मचाºयांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होत स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल १५ पोते कचरा निघाला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्णाच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेतच रोजच्या रोज स्वच्छता होत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अन्य विभागाचेही अधिकारी जिल्हा परिषदेत रोज येताना त्यांचे या कचºयाकडे कधी लक्षच गेले नाही का असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विविध ठिकाणी भेट देऊन तेथील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा नियमित आढावा घेत असताना त्यांच्या नजरेतून रोजच्या कामाचे ठिकाण असलेली जिल्हा परिषदेची इमारत कशी चुकली? की जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेप्रमाणेच जिल्ह्णातील आरोग्यसेवेकडेही केवळ स्वच्छता अभियान आणि छायाचित्रण उत्सवांपुरतेच पाहिले जाते असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे.आरोग्याचा धोका टळलाजिल्हा परिषद इमारतीच्या आवारात साचलेल्या कचºयामुळे डासांची उत्पत्ती होऊन येथे कार्यरत कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. परंतु, सुदैवाने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छता ही अभियान’मुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीची स्वच्छता झाल्याने जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच टळला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य