शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

१४ दिवसाच्या पावसाने गाठली ३० दिवसांची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 01:10 IST

जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी बरसली असून अवघ्या १४ दिवसांत पावसाने सप्टेंबर महिन्याची सरासरीदेखील गाठली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील पर्जन्यमान सरासरी २ हजार ८८१ मि. मी. इतके असताना मागील १४ दिवसांत २ हजार ९६१ मि. मी. इतका पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी १०२ इतकी आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे जिल्ह्यातील धरणेदेखील तृप्त झाली आहेत.

ठळक मुद्देबरसात : सप्टेंबर महिन्याच्या सरासरीला पोहोचला पाऊस

नाशिक : जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी बरसली असून अवघ्या १४ दिवसांत पावसाने सप्टेंबर महिन्याची सरासरीदेखील गाठली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील पर्जन्यमान सरासरी २ हजार ८८१ मि. मी. इतके असताना मागील १४ दिवसांत २ हजार ९६१ मि. मी. इतका पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी १०२ इतकी आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे जिल्ह्यातील धरणेदेखील तृप्त झाली आहेत.

यंदा राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला असताना नाशिक जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठ फिरविली होती. लांबलेला पाऊस आणि धरणांची खालावत जाणारी पातळी यामुळे जिल्ह्यावर पाण्याचे संकटही निर्माण झाले होते. पाण्याचे फेरनियोजन करण्याची वेळ आल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. मध्यंतरी जुलैच्या अखेरच्या चरणात काही ठिकाणी पाऊस झाल्याने काही प्रमाणात धरणात पाणी जमा झाले. त्यामुळे दिलासा मिळाला असताना पावसाने पुन्हा ओढ दिली.

ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याचा अनुभव असल्याने ऑगस्टमध्येही पावसाची अपेक्षा होती. मात्र, ऑगस्ट महिनाही कोरडा गेल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांनाच सप्टेंबरमध्ये वरूणराजाची जिल्ह्यावर कृपादृष्टी बरसली आणि मुसळधार झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणे तुडुंब झाली. बारा धरणांमधून विसर्ग करण्याची वेळ आली. नदी, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली. जोरदार बरसलेल्या पावसामुळे पाण्याचा प्रश्नदेखील निकाली निघाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्याचे सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २ हजार ८८१ मि.मी. इतके असल्याने पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्याची सरासरी या हंगामातही कायम राहील, अशी दाट अपेक्षा होती. त्यानुसार सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली असली तरी त्यासाठी संपूर्ण महिना थांबण्याची गरज लागली आहे. मुसळधार पावसामुळे अवघ्या १४ दिवसांतच सप्टेंबर महिन्याची सरासरी राखली गेली. अजूनही महिना संपण्यास पंधरा दिवसांचा कालावधी असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ससरारी पावसाचे रेकॉड होण्याची पूर्ण शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस