शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

१३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीकविम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:27 IST

पेठ : यावर्षी खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाची चाहूल लागलेल्या पेठ तालुक्यातील तब्बल १३ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा आधार घेतला आहे.

ठळक मुद्देपेठ तालुक्यात विक्र मी नोंदणी : वनपट्टेधारकांनाही मिळणार लाभ; खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : यावर्षी खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाची चाहूल लागलेल्या पेठ तालुक्यातील तब्बल १३ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा आधार घेतला आहे.पेठ तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा केवळ २५ टक्के पाऊस झाला असून, लावणी केलेल्या भात व नागली पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाईचा आधार म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेत दि. ३१ जुलै या अखेरच्या मुदतीत दहा हजार ५६२ शेतकºयांनी आॅनलाइन तर दोन हजार ९४५ शेतकºयांनी आॅफलाइन विमा घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल तीन पटीने विमाधारकांची वाढ झाली असून, कृषी विभागाच्या वतीने शेतकरीवर्गात केलेल्या जनजागृती व आॅनलाइन विमा भरण्यासाठी देण्यात येणाºया सुविधांमुळे शेतकºयांना विमा घेणे सोपे झाले.१०० टक्के भरपाई देण्याची मागणीपेठ तालुक्यातील भात, नागली, वरई या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून, यानंतरच्या पावसाचा शेतकºयांना काहीही फायदा होणार नसल्याने विमा कंपनीने सरसकट विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील वर्षी विमा कंपन्यांकडून ग्रामीण भागातील बहुतांश शेतकºयांना भरलेल्या हप्त्यापेक्षाही कमी रक्कम प्राप्त झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली होती.वनपट्टेधारकांना आॅफलाइन सुविधाआदिवासी भागात बहुतांश शेतकरी वनपट्टेधारक असून, सातबारा नसल्याने अशा शेतकºयांना आॅनलाइन विमा घेणे शक्य नसून कृषी विभागामार्फत अशा वनपट्टे (फॉरेस्ट प्लॉट) धारकांसाठी आॅफलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विमाधारकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.दरवर्षी बदलणारे हवामान आणि पावसाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना पिकांची हमी नसल्याने प्रधानमंत्री राष्ट्रीय पीकविमा योजनेत या वर्षी विक्र मी नोंदणी झाली असून, ज्या शेतकºयांकडे सातबारा नाही मात्र वनपट्टे जमीन आहे अशा शेतकºयांनाही या योजनेत सामावून घेतले आहे. नुकसानभरपाई बाबत कृषी विभाग शेतकºयांच्या सदैव सोबत आहे.- अरविंद पगारे,तालुका कृषी अधिकारी, पेठ

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी