शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात नवीन १३ गाव पाणीपुरवठा योजना मंजुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:58 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत देखील नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आल्याने येत्या वर्ष दिड वर्षात तालुका जलयुक्त शिवार योजनेतुन सन२०१४/१५ साठी १८ गावे, सन १५-१६ साठी ९ गावे, सन २०१७-१८ साठी पाच गावे असे मिळुन एकुण ३२ गावे यापुर्वीच जलयुक्त शिवाराने शेतीसाठी उपयुक्त झाली आहेत. आता नव्याने सन २०१८-१९ साठी नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक तयारी सुरु असुन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण या विभागामार्फत या १३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील. तथापि ही गावे धरणांपासुन दुर असली तरी परक्युलेशन परिसरात विहीरीस पाणी लागेल अशा ठिकाणी त्यानंतरच १३ गावांना कोणकोणत्या ठिकाणी पाणी लागेल. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडुन जागेबाबत शिफारस केल्यावरच योजनेसाठी विहीर घेण्यात येईल. तत्पुर्वी सर्व गावांच्या योजनांचे एस्टीमेट करणे ते एस्टीमेट मंजुर करु न घेणे योजनेचे प्लॅन एस्टीमेटला प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर निधी मंजुर होईल. शेवटी तांत्रिक मंजुरी मिळाल्यावरच प्रत्यक्षात कामे सुरु होतील. त्यामुळे पुढच्या वर्षा पर्यंत ही कामे पुर्ण होतील की नाही हे आज तरी सांगता येत नाही. तथापि कामे पुर्ण झाल्यानंतर मात्र योजना यशस्वी झाल्यास तालुका ख-या अर्थाने टँकरमुक्त होईल यात शंका नाही.----------------------------त्र्यंबकेश्वर अति पावसाचा तालुका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या खालोखाल गणला जातो. दरवर्षी २२०० ते २५०० मिमि पर्यंत पावसाची सरासरी साधारणपणे असते. तथापि तालुक्याची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ भागाची आहे. उंच सखल डोंगरावरु न पडलेले पाणी डोंगर उतारावरु न वाहन जाते. तालुक्यात सन २००५-०६ पासुन आतापर्यंत १०० वर योजना झाल्या असतील पण त्यातील काही योजना पुर्ण झाल्या तर ११योजना भ्रष्टाचारात वाहुन गेल्या. अशा योजनांच्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारत निर्माण योजना कार्यक्र मात पुर्वी या योजना राबविल्या. आता फक्त नाव बदलले.आता राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नव्याने या योजना राबविण्यात येत आहेत.--------------------------जलयुक्त शिवार योजनेमुळे तालुक्यातील ५४ गावे जलयुक्त शिवाराने समृध्द होणार असल्याने एकीकडे टँकरमुक्त गावे तर दुसरीकडे जलयुक्त शिवाराच्या गावांनी शेती समृध्द होणार आहे. शेतीचे सपाटीकरण शेतीत कायम स्वरु पी ओलावा परिणामी तिनही हंगामात बाराही महिने वेगवेगळी पिके घेता येतील. कायम टंचाईच्या खाईत सापडलेल्या गावांना टंचाई मुक्त करण्याचा आमचा मानस आहे.- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Nashikनाशिक