शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

त्र्यंबकेश्वर तालुक्यात नवीन १३ गाव पाणीपुरवठा योजना मंजुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:58 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत देखील नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आल्याने येत्या वर्ष दिड वर्षात तालुका जलयुक्त शिवार योजनेतुन सन२०१४/१५ साठी १८ गावे, सन १५-१६ साठी ९ गावे, सन २०१७-१८ साठी पाच गावे असे मिळुन एकुण ३२ गावे यापुर्वीच जलयुक्त शिवाराने शेतीसाठी उपयुक्त झाली आहेत. आता नव्याने सन २०१८-१९ साठी नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक तयारी सुरु असुन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण या विभागामार्फत या १३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील. तथापि ही गावे धरणांपासुन दुर असली तरी परक्युलेशन परिसरात विहीरीस पाणी लागेल अशा ठिकाणी त्यानंतरच १३ गावांना कोणकोणत्या ठिकाणी पाणी लागेल. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडुन जागेबाबत शिफारस केल्यावरच योजनेसाठी विहीर घेण्यात येईल. तत्पुर्वी सर्व गावांच्या योजनांचे एस्टीमेट करणे ते एस्टीमेट मंजुर करु न घेणे योजनेचे प्लॅन एस्टीमेटला प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर निधी मंजुर होईल. शेवटी तांत्रिक मंजुरी मिळाल्यावरच प्रत्यक्षात कामे सुरु होतील. त्यामुळे पुढच्या वर्षा पर्यंत ही कामे पुर्ण होतील की नाही हे आज तरी सांगता येत नाही. तथापि कामे पुर्ण झाल्यानंतर मात्र योजना यशस्वी झाल्यास तालुका ख-या अर्थाने टँकरमुक्त होईल यात शंका नाही.----------------------------त्र्यंबकेश्वर अति पावसाचा तालुका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या खालोखाल गणला जातो. दरवर्षी २२०० ते २५०० मिमि पर्यंत पावसाची सरासरी साधारणपणे असते. तथापि तालुक्याची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ भागाची आहे. उंच सखल डोंगरावरु न पडलेले पाणी डोंगर उतारावरु न वाहन जाते. तालुक्यात सन २००५-०६ पासुन आतापर्यंत १०० वर योजना झाल्या असतील पण त्यातील काही योजना पुर्ण झाल्या तर ११योजना भ्रष्टाचारात वाहुन गेल्या. अशा योजनांच्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारत निर्माण योजना कार्यक्र मात पुर्वी या योजना राबविल्या. आता फक्त नाव बदलले.आता राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नव्याने या योजना राबविण्यात येत आहेत.--------------------------जलयुक्त शिवार योजनेमुळे तालुक्यातील ५४ गावे जलयुक्त शिवाराने समृध्द होणार असल्याने एकीकडे टँकरमुक्त गावे तर दुसरीकडे जलयुक्त शिवाराच्या गावांनी शेती समृध्द होणार आहे. शेतीचे सपाटीकरण शेतीत कायम स्वरु पी ओलावा परिणामी तिनही हंगामात बाराही महिने वेगवेगळी पिके घेता येतील. कायम टंचाईच्या खाईत सापडलेल्या गावांना टंचाई मुक्त करण्याचा आमचा मानस आहे.- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Nashikनाशिक