शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

११ केव्हीच्या केबलचा झाला धुव्वा अन् आठ तास 'बत्ती गूल'

By अझहर शेख | Updated: October 26, 2023 15:42 IST

वडाळागावात कधी दिवसा तर कधी मध्यरात्री किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस वीजपुरवठा खंडित होतो अन् येथील रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वीज गायब झाली की उकाड्यासह डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण होतात. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येवर महावितरणला तोडगा काढता येऊ शकलेला नाही.

नाशिक : वडाळागाव अन् वीज गायब हे आता जुनं समीकरण बनलं आहे. या गावातील लोकांना जणू एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे विजेचा पुरवठा होऊ लागला आहे. गुरुवारचा (दि. २६) दिवस उजाडला अन् सकाळी सव्वासात वाजेच्या ठोक्याला संपूर्ण गावाची वीज गायब झाली. येथील पोलिस चौकीजवळच्या जय मल्हार कॉलनीत ११ केव्ही क्षमतेची अति उच्चदाबाच्या भूमिगत केबलचा ‘बार’ झाला. यामुळे तब्बल दुपारी दोन वाजेपर्यंत ‘बत्ती गूल’ झालेली होती.

वडाळागावात कधी दिवसा तर कधी मध्यरात्री किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस वीजपुरवठा खंडित होतो अन् येथील रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वीज गायब झाली की उकाड्यासह डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण होतात. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येवर महावितरणला तोडगा काढता येऊ शकलेला नाही. तात्पुरत्या प्रमाणात बिघाड दूर केला की, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी काहीतरी बिघाड होतो नाहीतर मुख्य उपकेंद्रावरून ‘लोड शेडिंग’च्या नावाखाली वडाळागावचा वीजपुरवठा रोखला जातो. या समस्येला कंटाळून आता वडाळावासीयांनी जितके तास वीज महिनाभरातून गायब राहील तितके रूपये वीज बिलातून महावितरणने कपात करावी, अशी संतप्त मागणी केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज