शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मुंबई बाजार समितीसाठी शंभर टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 7:48 PM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून दोन संचालक नेमण्याची तरतूद असून, नाशिक विभागातून दोन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यात नाशिक जिल्ह्यातून जयदत्त होळकर, अद्वय हिरे हे दोघे

ठळक मुद्दे शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदानाला सुरूवात पोलीस बंदोबस्तात मतपेटी मुंबईकडे रवाना

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शंभर टक्के मतदान शांततेत होवून रात्री मतपेट्या पोलीस बंदोबस्तात नवी मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातून दोन उमेदवार रिंगणात होते.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून दोन संचालक नेमण्याची तरतूद असून, नाशिक विभागातून दोन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यात नाशिक जिल्ह्यातून जयदत्त होळकर, अद्वय हिरे हे दोघे तर नगर, धुळे, जळगाव, नंदुबार या जिल्ह्यातून प्रभाकर पवार, सुनील पवार, किशोर भिकन पाटील, किशोर देवीदास पाटील, रितेश पाटील, श्रीहर्ष शेवाळे यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील सतरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार असून, जिल्ह्यात २३८ मतदार आहेत. प्रत्येकी दोन मते देण्याचा अधिकार असल्याने व नाशिक जिल्ह्यातच सर्वाधिक मतदार असल्यामुळे सर्वच उमेदवारांनी नाशिकवर लक्ष केंद्रीत केले होते. शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदानाला सुरूवात करण्यात आली. मतदार संख्या मर्यादित असली तरी, या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी व विरोधक अशी लढत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी मतदान स्थळावर झाडून हजेरी लावली होती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंगळे गटाचे चौदा सदस्यांनी एकाच वेळी मतदान केंद्रावर येवून मतदानाचा हक्क बजावला तर एक महिला मतदार आजारी असल्याने रूग्णालयात दाखल असल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारांच्या समर्थकांनी त्या अवस्थेतही त्यांना मतदान केंद्रावर आणून मतदानाचा हक्क बजावण्यास भाग पाडले. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपुष्टात आली. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारांनी शंभर टक्के हक्क बजावल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मतपेटी मुंबईकडे रवाना करण्यात आली. सोमवारी नवी मुंबईत मतमोजणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकNashikनाशिक