शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

बाहेरून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:53 IST

मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देभरारी पथकाची स्थापना : प्रशासन - लोकप्रतिनिधी समन्वयासाठी बैठक

सिन्नर : मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असून, गर्दीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती आणि गोपनीय माहिती देण्याकरिता हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नगराध्यक्ष किरण डगळे, सभापती शोभा बर्के, उपसभापती संग्राम कातकडे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, सुमन बर्डे, संगीता पावसे, संजय सानप, दीपक खुळे, नामदेव शिंदे आदी उपस्थित होते.मुंबईसह अन्य हॉटस्पॉट असलेल्या शहरातून नागरिक गावी परतत आहेत. परतणाºया नागरिकांपासून स्थानिकांना कोरोनाची बाधा होऊ लागल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. बाहेरून येणाºया नागरिकांचे १०० टक्के विलगीकरण करणे गरजेचे असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. ग्रामपंचायत स्तरावर बाहेरून येणाºया नागरिकांचे विलगीकरण नियोजन अगोदर होणे गरजेचे होते. अन्य जिल्ह्यात यापूर्वीच झाले आहे. गावनिहाय पालक अधिकाºयांची नेमणूक बाहेरून येणाºया नागरिकांना स्थानिक शाळा अथवा वेगळी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर नियोजन होण्यासाठी ग्रामसेवक अथवा तलाठी यास पालक अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या मदतीतून ही सुविधा स्थानिक ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

गोपनीय माहितीसाठी हेल्पलाइन नंबरबाहेरून येणारे नागरिक, नियमांची होणारी पायमल्ली याबाबत स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांच्या अडचणी विचारात घेता हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी त्यांच्याजवळील गोपनीय माहिती देऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

गर्दी नियंत्रणासाठी फिरते पथकलॉकडाउन काळात दुकाने सुरू करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना आढळून आले आहे. नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यास आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे. गर्दी, नियमाव्यतिरिक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत या वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू असल्यास दुकाने यांची छायाचित्रे काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य