शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

बाहेरून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:53 IST

मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देभरारी पथकाची स्थापना : प्रशासन - लोकप्रतिनिधी समन्वयासाठी बैठक

सिन्नर : मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असून, गर्दीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती आणि गोपनीय माहिती देण्याकरिता हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नगराध्यक्ष किरण डगळे, सभापती शोभा बर्के, उपसभापती संग्राम कातकडे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, सुमन बर्डे, संगीता पावसे, संजय सानप, दीपक खुळे, नामदेव शिंदे आदी उपस्थित होते.मुंबईसह अन्य हॉटस्पॉट असलेल्या शहरातून नागरिक गावी परतत आहेत. परतणाºया नागरिकांपासून स्थानिकांना कोरोनाची बाधा होऊ लागल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. बाहेरून येणाºया नागरिकांचे १०० टक्के विलगीकरण करणे गरजेचे असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. ग्रामपंचायत स्तरावर बाहेरून येणाºया नागरिकांचे विलगीकरण नियोजन अगोदर होणे गरजेचे होते. अन्य जिल्ह्यात यापूर्वीच झाले आहे. गावनिहाय पालक अधिकाºयांची नेमणूक बाहेरून येणाºया नागरिकांना स्थानिक शाळा अथवा वेगळी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर नियोजन होण्यासाठी ग्रामसेवक अथवा तलाठी यास पालक अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या मदतीतून ही सुविधा स्थानिक ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

गोपनीय माहितीसाठी हेल्पलाइन नंबरबाहेरून येणारे नागरिक, नियमांची होणारी पायमल्ली याबाबत स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांच्या अडचणी विचारात घेता हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी त्यांच्याजवळील गोपनीय माहिती देऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

गर्दी नियंत्रणासाठी फिरते पथकलॉकडाउन काळात दुकाने सुरू करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना आढळून आले आहे. नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यास आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे. गर्दी, नियमाव्यतिरिक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत या वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू असल्यास दुकाने यांची छायाचित्रे काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य