शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

तब्बल ८ लाख मे. टन द्राक्षमाल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 12:01 AM

कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देराज्यातील स्थिती : कोरोनाच्या फटक्याने निर्यात अवघड; उत्पादक आर्थिक अडचणीत

नाशिक : कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.द्राक्ष हंगाम बहरात असताना कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. सर्वत्र लॉकडाउन झाल्याने द्राक्ष निर्यात बंद झाली. याबाबत सातत्याने झालेली ओरड आणि बळीराजाचे होणारे नुकसान पाहता संचारबंदीच्या काळात शेतमाल वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असली तरी परराज्यात अनेक अडचणी उभ्या ठाकत असल्याने उत्पादकांवरील संकट कायम आहे. सद्य:स्थितीत उत्पादक वाराणसी, कोलकाता यासारख्या शहरात द्राक्ष निर्यातीचा प्रयत्न करत असले तरी, ‘पॅकिंग’साठी संबंधित ठिकाणी मजूरच मिळत नाही, तर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनीहीपाठ फिरवल्याने माल पडून आहे. काही व्यापारी उत्साह दाखवितअसले तरी या ठिकाणी पोहोचेपर्यंतचा खर्च वसूल होणे जिकिरीचे आहे. शिवाय के्रटमध्ये असाच माल पडून राहिल्यास द्राक्षांचे मणी गळून पडण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.निर्यातीचा हंगाम २० एप्रिलपर्यंत चालतो. या काळात राज्यभरातून सुमारे २००० कंटेनर इतका माल ठिकठिकाणी गेला असता, मात्र हंगामातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढणार कसे? असा प्रश्न उत्पादकांपुढे कायम आहे. त्यासाठी शासनानेच आता बळीराजाला न्याय देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.निसर्गानेही मारले...कोरोनाचे सावट कायम असताना राज्याच्या अनेक भागात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसाने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले. या दुहेरी संकटाचा सामना कसा करायचा, असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे.गावोगावी विक्रीची परवानगी द्या...शेतमाल वाहतुकीस शासनाने परवानगी दिली असली तरी निर्यातीचे संकट कायम आहे. संचारबंदीच्या काळात शासनाने द्राक्ष उत्पादकांना विशेष पास देऊन गावोगावी द्राक्ष विकता येतील अशी व्यवस्था करावी. त्यामुळे काहीसे नुकसान टाळता येईल, अशी मागणी निर्यातदार मधुकर ढोमसे यांनी केली आहे.कोरोना आणि निसर्गाच्या फटक्याने ‘मार्च एण्ड’नंतर बळीराजाचाच ‘एण्ड’ होतो का? अशी भीती निर्माण झाली आहे. शासनाने आता महत्त्वाचा घटक समजल्या जाणाºया बळीराजाला हजारात मदत न करता लाखात मदत करून उभारी देणे अंत्यत महत्त्वाचे आहे.-जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, राज्य बागायतदार संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र