शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जिल्हा परिषद निवडणुकीला राष्ट्रपती राजवटीचा अडसर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:23 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह पाच जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा:या पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह पाच जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा:या पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार झाल्या आहेत. राष्ट्रपती राजवटीचा या निवडणुकीला कुठलाही अडसर नसल्याने पुढील आठवडय़ात होणा:या उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या कार्यकाळ पुर्ण झाला असून वर्षभरापासून तेथे प्रशासक आहेत. या निवडणुकांसदर्भात अनेक ठिकाणी न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्याबाबतच्या सुनावणीनंतर  राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या याद्या प्रसिद्ध होऊन त्यावरील हरकतींवरही सुनावणी झाली असून अंतिम मतदार याद्या तयार झाल्या आहेत.याच पाश्र्वभुमीवर राज्यातील  राजकीय परिस्थितीने वेगळा रंग घेतला. कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याशिवाय काँगेंस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाशिवआघाडी तयार झाली असून या आघाडीचे सरकार पुढच्या काही दिवसात सत्तेवर येईल असे चित्र   आहे. अर्थात राज्यात सत्ता स्थापन होईल किंवा राष्ट्रपती राजवट लांबली तरी जिल्हा परिषद निवडणुकीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली.त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांसदर्भात आता एका याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबतची कार्यवाही सुरू असून निवडणुकीची प्रक्रिया अंतिम    टप्प्यात असल्याचे सूत्रांनी     सांगितले.