शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

बारी धरणातील जलसाठय़ाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडाळी : जयनगर, ता.शहादा येथे श्रमदानाद्वारे जलसंधारणाची कामे करण्यात आली होती.  बारी धरणातील जलसाठय़ाचे पूजन उपविभागीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडाळी : जयनगर, ता.शहादा येथे श्रमदानाद्वारे जलसंधारणाची कामे करण्यात आली होती.  बारी धरणातील जलसाठय़ाचे पूजन उपविभागीय अधिकारी  चेतन गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जलसंधारणाच्या कामासाठी सहकार्य करणा:या ट्रॅक्टर मालकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पुणे कृभको कंपनीचे विभागीय व्यवस्थापक आर.आर. पवार, धुळे येथील विभागीय अधिकारी पियूष नेमा, शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे,  उपविभागीय अभियंता बेहरे,  पं.स.चे अभियंता आर.के. कुवर, सुदर्शन पाटील, के.डी. पाटील, एस.बी. पवार, जयनगरचे तलाठी सुभाष पाडवी, सरपंच मीना सोनवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी येथील हेरंब गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर जयनगर-उभादगड शिवारातील श्रमदानातून बांधलेल्या बारी धरणात साडी-चोळी, नारळ, पुष्प वाहून जलपूजन करण्यात आले. हेरंब  गणेश मंदिरात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी गिरासे म्हणाले की,  जयनगर गावातील ग्रामस्थ व शेतक:यांनी लोकवर्गणी गोळा करून श्रमदानाद्वारे एक मोठी चळवळ उभी केली आहे. हे विधायक काम हाती घेऊन जिल्ह्यात जयनगर गावाचा नावलौकिक  केला आहे. पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असून बारी धरणातील पाण्याचा परिसरातील गावांना फायदा होणार आहे. जलमित्र  जितेंद्र पाटील यांच्या प्रय}ांना ग्रामस्थांचे योगदान लाभल्याने ते  शक्य झाल्याचे गिरासे यांनी सांगितले.या जलसंवर्धनाच्या कामासाठी येथील शेतक:यांनी एकरी एक हजार रुपयेप्रमाणे निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली होती. नाम फाउंडेशनचे मार्गदर्शन व प्रशासनाच्या सहकार्याने  हे काम पूर्णत्वास आले. जलसंधारणाच्या कामासाठी येथील शेतक:यांनी विनामूल्य स्वत:चे ट्रॅक्टर तब्बल चार ते पाच महिने गाळ काढण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यांचे योगदान खरच कौतुकस्पाद असल्याने ट्रॅक्टर मालकांचा सत्कार उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या हस्ते  करण्यात आला. त्यात ट्रॅक्टर मालक दगडू पाटील, भिका माळी, विठोबा माळी, भगवान  पाटील, राजाराम पाटील, किशोर माळी, शरद पाटी, सुनील माळी, कृष्णा माळी, विनोद माळी, अशोक माळी, भरत पाटील, भरत नगराळे,  राजाराम पाटील, विनोद माळी, रघुनाथ माळी, पितांबर माळी, तुकाराम पाटील, शरद पाटील, आनंदसिंग गिरासे, गोपाल माळी, अशोक पाटील आदी शेतक:यांनी विनामूल्य ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. कृभको कंपनीतर्फे स्वच्छ भारत निर्मल भारत या मोहिमेअंतर्गत गावात स्वच्छता राहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच जि.प. मराठी शाळा, ग्रामपंचायत, माध्यमिक शाळा,  हॉटेल, बाजारपेठ, मंदिर परिसर आदी 16 ठिकाणी कचराकुंडींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ईश्वर राजाराम माळी, अजरुन सोनवणे,   संदीप माळी, निंभोराचे सरपंच  रामचंद्र ठाकरे, हेरंब ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, अशोक माळी, दीपक गोसावी, अंकुश सोनवणे, अतुल माळी,  ग्रा.पं. सदस्य छगन पारधी, भावराव माळी, मोहन पारधी, कोतवाल दयाराम भील व  ग्रामस्थ उपस्थित होते.