शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

महामारीतही रोहयोवरील मजूर असुरक्षीतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:24 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या कामावर काम करणारे मजूर मात्र सद्याच्या महामारीच्या काळात असुरक्षीतच असल्याचे चित्र आहे. मजुरांच्या कामाच्या ठिकाणी ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना प्रथमोपचार पेटी, ना पाळणार घर ना सॅनिटायझर. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने तो एक धोक्याचा संकेत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले जवळपास ४० हजारापेक्षा अधीक मजूर जिल्ह्यात परतले आहेत. सद्याच्या स्थितीत सर्वच कामे बंद असल्याने मजूरही रिकाम्या हाती बसले आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने मनरेगा वरील कामांना प्राधान्य दिले असून ४१८ गावात कामे सुरू केली आहेत. त्यावर जवळपास ३० हजार मजुरांना काम दिले आहे. या मजुरांना पहिल्या टप्प्यातील ३ कोटी ९३ लाख रुपये वेतन देण्यातही आले आहे. या कामांची स्थिती पहाता सद्या तरी राज्यात पाचव्या क्रमांकावर जिल्हा आहे.हे काम जरी समाधानकारक असले तरी प्रत्यक्षात मात्र कामाच्या ठिकाणी मजुरांची कुठलीही सुरक्षा व्यवस्था व काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. या बाबत नंदुरबार, शहादा व धडगाव तालुक्यातील काही कामांवर फेरफटका मारला असता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, लहान मुलांसाठी पाळणाघर आवश्यक आहे परंतु रखरखत्या उन्हातही तशी व्यवस्था नाही. काम करतांना मजुरांना दुखापत झाल्यास प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. पण त्याचीही व्यवस्था नाही. आजच्या स्थितीत कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सर्वांनाच सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देते पण रोहयोवरील कामांवरील मजुरांना मात्र ती सुविधा नाही.याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे परराज्यातून मजूर परतत आहेत तसे त्या मजुरांची प्राथमिक तपासणी करून १४ दिवस घरातच क्वॉरंटाईन केले जात आहे. मात्र रोहयोच्या कामांवर असे शिक्के असलेले मजूरही दिसून आले.एकुणच नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त होत आहे. रुग्णालयातील उपचार घेणारे सर्व रुग्ण बरे झाल्याने ती एक दिलासादाय बाब आहे. अशा स्थितीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मनरेगाच्या कामांवरील मजुरांकडे अधीक लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.सद्याची परिस्थिती पहाता मजुरांना सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था आवश्यक आहे. शिवाय पाणी, प्रथमोपचार पेटी व पाळणाघरांच्या सुविधांबाबत सुचना यापूर्वीच केल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा सर्वांना नव्याने सुचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहोत. तसेच क्वॉरंटाईन केलेले मजूर कामावर येणार नाहीत याची काळजी घेण्याची सुचना सरपंच व पोलीस पाटलांना देण्यात येणार आहे.-अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा, जि.प., नंदुरबार.