शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

महामारीतही रोहयोवरील मजूर असुरक्षीतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:24 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या कामावर काम करणारे मजूर मात्र सद्याच्या महामारीच्या काळात असुरक्षीतच असल्याचे चित्र आहे. मजुरांच्या कामाच्या ठिकाणी ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना प्रथमोपचार पेटी, ना पाळणार घर ना सॅनिटायझर. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने तो एक धोक्याचा संकेत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले जवळपास ४० हजारापेक्षा अधीक मजूर जिल्ह्यात परतले आहेत. सद्याच्या स्थितीत सर्वच कामे बंद असल्याने मजूरही रिकाम्या हाती बसले आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने मनरेगा वरील कामांना प्राधान्य दिले असून ४१८ गावात कामे सुरू केली आहेत. त्यावर जवळपास ३० हजार मजुरांना काम दिले आहे. या मजुरांना पहिल्या टप्प्यातील ३ कोटी ९३ लाख रुपये वेतन देण्यातही आले आहे. या कामांची स्थिती पहाता सद्या तरी राज्यात पाचव्या क्रमांकावर जिल्हा आहे.हे काम जरी समाधानकारक असले तरी प्रत्यक्षात मात्र कामाच्या ठिकाणी मजुरांची कुठलीही सुरक्षा व्यवस्था व काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. या बाबत नंदुरबार, शहादा व धडगाव तालुक्यातील काही कामांवर फेरफटका मारला असता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, लहान मुलांसाठी पाळणाघर आवश्यक आहे परंतु रखरखत्या उन्हातही तशी व्यवस्था नाही. काम करतांना मजुरांना दुखापत झाल्यास प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. पण त्याचीही व्यवस्था नाही. आजच्या स्थितीत कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सर्वांनाच सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देते पण रोहयोवरील कामांवरील मजुरांना मात्र ती सुविधा नाही.याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे परराज्यातून मजूर परतत आहेत तसे त्या मजुरांची प्राथमिक तपासणी करून १४ दिवस घरातच क्वॉरंटाईन केले जात आहे. मात्र रोहयोच्या कामांवर असे शिक्के असलेले मजूरही दिसून आले.एकुणच नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त होत आहे. रुग्णालयातील उपचार घेणारे सर्व रुग्ण बरे झाल्याने ती एक दिलासादाय बाब आहे. अशा स्थितीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मनरेगाच्या कामांवरील मजुरांकडे अधीक लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.सद्याची परिस्थिती पहाता मजुरांना सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था आवश्यक आहे. शिवाय पाणी, प्रथमोपचार पेटी व पाळणाघरांच्या सुविधांबाबत सुचना यापूर्वीच केल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा सर्वांना नव्याने सुचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहोत. तसेच क्वॉरंटाईन केलेले मजूर कामावर येणार नाहीत याची काळजी घेण्याची सुचना सरपंच व पोलीस पाटलांना देण्यात येणार आहे.-अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा, जि.प., नंदुरबार.