शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

महामारीतही रोहयोवरील मजूर असुरक्षीतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:24 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या कामावर काम करणारे मजूर मात्र सद्याच्या महामारीच्या काळात असुरक्षीतच असल्याचे चित्र आहे. मजुरांच्या कामाच्या ठिकाणी ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना प्रथमोपचार पेटी, ना पाळणार घर ना सॅनिटायझर. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने तो एक धोक्याचा संकेत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले जवळपास ४० हजारापेक्षा अधीक मजूर जिल्ह्यात परतले आहेत. सद्याच्या स्थितीत सर्वच कामे बंद असल्याने मजूरही रिकाम्या हाती बसले आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने मनरेगा वरील कामांना प्राधान्य दिले असून ४१८ गावात कामे सुरू केली आहेत. त्यावर जवळपास ३० हजार मजुरांना काम दिले आहे. या मजुरांना पहिल्या टप्प्यातील ३ कोटी ९३ लाख रुपये वेतन देण्यातही आले आहे. या कामांची स्थिती पहाता सद्या तरी राज्यात पाचव्या क्रमांकावर जिल्हा आहे.हे काम जरी समाधानकारक असले तरी प्रत्यक्षात मात्र कामाच्या ठिकाणी मजुरांची कुठलीही सुरक्षा व्यवस्था व काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. या बाबत नंदुरबार, शहादा व धडगाव तालुक्यातील काही कामांवर फेरफटका मारला असता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, लहान मुलांसाठी पाळणाघर आवश्यक आहे परंतु रखरखत्या उन्हातही तशी व्यवस्था नाही. काम करतांना मजुरांना दुखापत झाल्यास प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. पण त्याचीही व्यवस्था नाही. आजच्या स्थितीत कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सर्वांनाच सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देते पण रोहयोवरील कामांवरील मजुरांना मात्र ती सुविधा नाही.याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे परराज्यातून मजूर परतत आहेत तसे त्या मजुरांची प्राथमिक तपासणी करून १४ दिवस घरातच क्वॉरंटाईन केले जात आहे. मात्र रोहयोच्या कामांवर असे शिक्के असलेले मजूरही दिसून आले.एकुणच नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त होत आहे. रुग्णालयातील उपचार घेणारे सर्व रुग्ण बरे झाल्याने ती एक दिलासादाय बाब आहे. अशा स्थितीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मनरेगाच्या कामांवरील मजुरांकडे अधीक लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.सद्याची परिस्थिती पहाता मजुरांना सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था आवश्यक आहे. शिवाय पाणी, प्रथमोपचार पेटी व पाळणाघरांच्या सुविधांबाबत सुचना यापूर्वीच केल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा सर्वांना नव्याने सुचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहोत. तसेच क्वॉरंटाईन केलेले मजूर कामावर येणार नाहीत याची काळजी घेण्याची सुचना सरपंच व पोलीस पाटलांना देण्यात येणार आहे.-अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा, जि.प., नंदुरबार.