शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

नंदुरबारात दीड लाख कुटुबांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:52 PM

‘नरेगा’ : तीन वर्षाची आकडेवारी, वर्षात मजुरीपोटी 110 कोटींची रक्कम अदा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगार हमी योजनेतून (नरेगा) गेल्या तीन वर्षात 1 लाख 47 हजार 371 कुटुंबियांच्या हाताला  काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे या कुटुंबियांसाठी 110 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम मजुरीपोटी अदा करण्यात आली आह़े एकीकडे अकुशल निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र कुशल निधीसाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्रतिक्षा करावी लागत असल्याची माहिती आह़ेया योजनेअंतर्गत वर्षातील 100 दिवस केंद्र सरकारतर्फे तर उर्वरीत 265 दिवस राज्य सरकारतर्फे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात असतो़ पूर्वी या कामासाठी प्रतिव्यक्ती 192 रुपये मजुरी दिली जात होती़ परंतु आता ती वाढवून 201 रुपये करण्यात आली आह़े दरम्यान, नरेगाअंतर्गत 2015-2016 मध्ये 4 हजार 610, 2016-2017 मध्ये 4 हजार 548 तर 2017 च्या नोव्हेंबर्पयत एकाच वर्षी तब्बल 9 हजार 950 अशी एकूण 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़दीड लाख कुटुंबियांच्याहाताला कामयोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दीड लाख कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े 2015-2016 वर्षात 47 हजार  823, 2016-2017 वर्षात 55 हजार 87 तर नोव्हेंबर 2017 र्पयत 44 हजार 461 कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे वरील वर्षात अनुक्रमे 37 कोटी 72 लाख, 46 कोटी 57 लाख व 26 कोटी 37 लाख असा एकूण 110 कोटी 66 लाख रुपयांचा अकुशल निधी मजुरीपोटी वाटप करण्यात आला आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात मजुरांमध्ये बेरोजगारीची मोठी समस्या आह़े त्यामुळे अशांना जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन    करुन त्याना रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली जात़े त्याच प्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करुन अकुशल निधीचे मजुरीपोटी वाटप करण्यात येत असत़े ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात मजुरांचे मार्गदर्शनाअभावी स्थलांतर होत असत़े मजुरांचे गुजरात, मध्यप्रदेशात रोजगारासाठी होणा:या स्थलांतरात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक परिसरातच रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आव्हाण जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आह़े जिल्ह्यात मजुरीचा प्रश्न गेल्या काही वर्षात वाढत आह़े कुटुंबियांना आपला घराचा गाडा ओढतांना मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत असत़े परंतु गेल्या जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्याने नरेगांतर्गत हाताला काम मिळू लागले असल्याने  स्थानिक मजुरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े मागेल त्याला  काम या तत्वावर मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन सकारात्मक भुमिका                    पार पाडत असल्याचे दिसून येत            आह़े गेल्या तीन वर्षात योजनेअंतर्गत 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़ त्यात विविध रस्ते, सिंचन विहिरी, शौचालये आदींचे कामे पूर्णत्वास येत असतात़ नरेगासाठी केंद्र व राज्य असे दोन्ही सरकारांकडून ठरविक दिवसांच्या रोजगारापोटी असलेल्या निधीची तरतुद करण्यात आले आह़े परंतु काही प्रमाणात केंद्राकडून निधी येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़