शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
5
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
6
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
7
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
8
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
9
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
10
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
11
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
12
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
13
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
14
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
15
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
16
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
17
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
18
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
19
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
20
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
Daily Top 2Weekly Top 5

राजरंग- जिल्ह्याच्या विकास निधीवर अन्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 13:29 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा निर्मितीला २२ वर्षे झाले असून जिल्ह्याचा विस्तार, विकासाच्या गरजा, भौतिक सुविधांचा विस्तार ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्हा निर्मितीला २२ वर्षे झाले असून जिल्ह्याचा विस्तार, विकासाच्या गरजा, भौतिक सुविधांचा विस्तार वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्याचा वार्षिक आराखडा मात्र भक्कम व्हावा, अशी अपेक्षा असताना विकासनिधी कमी होत असल्याने त्याबाबत जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी चिंतन करण्याची गरज आहे. अगदी गेल्यावर्षी हा वार्षिक आराखडा ४२४ कोटींचा होता. कोरोनामुळे त्यातील निधी खर्च झाला नाही. म्हणून, यावर्षी आराखड्यातील तरतूद वाढावी, अशी अपेक्षा असताना उलट २०२१-२२ चा केवळ ३५० कोटी रुपयांच्या आराखड्याची शिफारस करण्यात आली आहे. नंदुरबार हा राज्यातील विकासाच्या बाबतीत मागास असलेला जिल्हा मानला जातो. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न, साक्षरता, सिंचनक्षेत्र आदी विविध बाबतीत हा जिल्हा सर्वात मागे आहे. जिल्ह्यातील वीज आणि रस्ते न पोहोचलेल्या गावांची संख्याही राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाचे चित्र समोर ठेवूनच स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली. जिल्हा झाल्यानंतर जिल्ह्याचा स्वतंत्र वार्षिक आराखडाही तयार झाला. यापूर्वी धुळे जिल्हा एकत्रित असताना वार्षिक आराखड्यातील निधी या भागाच्या वाट्याला अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार होती. जिल्हा निर्मितीनंतर ही तक्रार दूर झाली. सुरुवातीच्या काळात वार्षिक आराखड्यातील निधीची तरतूदही बऱ्यापैकी होत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो पुन्हा कमी होऊ लागला. गेल्यावर्षी ४२४ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली होती. त्यात सर्वसाधारण योजनेंतर्गत ११५ कोटी तर आदिवासी उपयोजनेंतर्गत २९३ कोटी ३७ लाख व इतर योजनेंतर्गत उर्वरित निधीची तरतूद होती. मात्र, गेले १० महिने कोरोनामुळे विकासनिधीत कपात करण्यात आली. अधिकृतपणे त्याबाबत भाष्य नसले तरी आकडेवारी मात्र सर्वकाही सांगून जाते. सर्वसाधारण योजनेतील ११५ कोटींपैकी केवळ १८ कोटी ३३ लाख रुपये तर आदिवासी उपयोजनेंतर्गत २९३ कोटींपैकी केवळ ५३ कोटी ८३ लाख रुपये खर्च झाले आहेत. टक्केवारीच्या भाषेत बाेलायचे झाल्यास २० टक्के निधीही खर्च झालेला नाही. आता दोन महिन्यांत ८० टक्के खर्च करण्याचे नियोजन जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाच्या बैठकीत करण्यात आले. खर्च कमी झाल्याचे कारण ग्रामपंचायत निवडणुकीचे देण्यात आले असले तरी कोरोनाच्या परिस्थितीमुळे परिणाम झाल्याचे सर्वश्रुत आहे. लोकांचीही त्याबाबत तक्रार नाही. पण किमान ही भर आगामी वर्षात तरी निघावी, अशी जनतेची अपेक्षा असताना त्यावर मात्र पाणी फेरल्याचे चित्र आहे. कारण, नुकत्याच झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत २०२१-२२ या वर्षासाठी ३५० कोटी ७४ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून, त्याच्या मान्यतेसाठी हा आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे. या आराखड्याबाबत मात्र जनतेतून नाराजीचा सूर आहे. कारण, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक आराखड्यातील निधीची तरतूद जास्त होणे आवश्यक आहे. हा निधी कमी झाल्यास पुढील वर्षाच्या आराखड्यावरही त्याचा परिणाम जाणवणार असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील बहुतांश भाग हा आदिवासी उपयोजनेंतर्गत आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकास मंत्रीपद जिल्ह्यातीलच नेते ॲड.के. सी. पाडवी यांच्याकडे आहे. पालकमंत्री तेच असल्याने जिल्हा वार्षिक नियोजन समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.