शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

देशसेवक सैनिकाप्रती व्यक्त कराया ‘आदरभाव’ जमला सारा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत सेवानिवृत्त झालेल्या सैनिक भूमीपुत्राचा आसाणे, ता.नंदुरबार येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत सेवानिवृत्त झालेल्या सैनिक भूमीपुत्राचा आसाणे, ता.नंदुरबार येथील गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गावातून मिरवणूक काढत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.आसाणे येथील अनेक युवक देशसेवा करण्यासाठी सैन्यदलाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकीच एक असलेले महेशकुमार पंडित पाटील हे १७ वर्षांची सेवा बजावून सैन्य दलातून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे गावात आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी त्यांची भव्य शोभायात्रा काढली. सजविलेल्या उघड्या जीपमधून गावभर त्यांची मिरवणूक काढली. जीपवर स्वत: जवान महेशकुमार यांच्यासह त्यांची आई व पत्नी देखील होते. घरोघरी त्यांची औक्षण करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्टÑवादीचे डॉ.अभिजीत मोरे, बाजार समितीचे माजी सभापती युवराज पाटील, उपसभापती हरिदादा पाटील, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, अखिल भारतीय लोणी मराठा समाजाचे मनोज शेलार, सुरेश भदाणे, ज्ञानेश्वर पाटील, भरत सावंत, नंदुरबारचे नगरसेवक रघुवंशी, धमेंद्र माळी, विशाल माळी, जगदीश सोनवणे, उमेश पांढारकर, राजेंद्र धनगर, वन परिमंडळ अधिकारी पी.एस.पाटील, मुख्याध्यापक एल.एच.पाटील, रवींद्र कंचन पाटील, पंढरीनाथ पाटील, समाधान पाटील, रवींद्र के.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी विजय चौधरी, अभिजीत मोरे, गजेंद्र शिंपी, हरिदादा पाटील, सुरेश भदाणे, धर्मेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला महेश पाटील यांनी उत्तर देत प्रत्येक जवानाविषयी देशवासीयांची ही भावना राहिली तर प्रत्येक तरुण देशसेवेत जाण्यासाठी नक्कीच तयार होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या १७ वर्षांच्या कार्यकाळातील अनुभव कथन केले. सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले. ग्रामस्थ, विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांचा उत्साह यावेळी मोठ्या प्रमाणावर दिसून आला. कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय लोणी मराठा समाज, दगडू देव युवा मित्र मंडळ, बजरंग मित्र मंडळ, पवनपूत्र मित्र मंडळ, जयभद्रा मित्र मंडळ आणि ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले.