शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

नंदुरबार : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला. खासदार ...

नंदुरबार : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला. खासदार राहुल गांधी यांना २०२४ मध्ये कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधानपदी बसवायचे हा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. तोच मंत्र घेऊन देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आजपासून चैतन्य भरण्याचे काम काँग्रेस नेते करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही संकल्प दिन आणि केंद्र शासनाच्या महागाईच्या धोरणाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पण संकल्प दिन साजरा करताना नंदुरबारच्या काँग्रेसचा जिल्हाध्यक्षपदाची जागा रिक्त असल्याची उणीव मात्र कार्यकर्त्यांना निश्चित जाणवली. जर जिल्हाध्यक्ष नियुक्त झाला असता तर संकल्प दिन कार्यक्रमाचे नियोजन अधिक विस्ताराने आणि जिल्हाभर नियोजनपूर्व झाले असते, अशी खंतही काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालिन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून म्हणजे जवळपास दोन वर्षापासून काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नाही. रघुवंशींच्या पक्षाच्या राजीनाम्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून दिलीप नाईक व सुभाष बुला पाटील यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. तेव्हापासून ते काम पाहत आहेत. तब्बल वर्षभरानंतर जिल्ह्यातील कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यातही नंदुरबार तालुका अध्यक्षांसह इतर पदे मात्र अजूनही रिक्तच आहेत. एकेकाळी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला काँग्रेसचा अध्यक्ष दोन वर्षापासून मिळू नये हा राजकारणातील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. तसे पाहता जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. या पक्षाला मिळालेली मतेदेखील पक्ष जिल्ह्यात भविष्यात भक्कमपणे पुन्हा पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो याचे संकेत देणारे होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने चार जागांपैकी पूर्वीप्रमाणे दोन जागा राखल्या. मतांची संख्या निश्चित कमी झाली पण दोन जागा कायम राहिल्या. पुढे पक्षाला कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले. राज्याच्या मंत्रीमंडळात ॲड.के.सी. पाडवी यांना आदिवासी विकासमंत्रीपद हे महत्त्वाचे खाते मिळाले. जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील तेच आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे २३ सदस्य विजयी झाले असून अध्यक्षपद याच पक्षाकडे आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्याच्या सत्तेच्या वाट्यात काँग्रेसला मोठे स्थान आहे. असे असताना पक्ष संघटनाबाबत मात्र पूर्वीसारखा उत्साह दिसून येत नाही.

जिल्ह्यात सध्या काँग्रेस पक्षात शिस्त आणि सुसूत्रतेचा अभाव निश्चितच जाणवत आहे. त्याचा कार्यकर्त्यांना चांगलेच फावत आहे. अशातच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे पुढील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले हे पक्षाला आक्रमक प्रदेश अध्यक्ष लाभले असून त्यांनी पक्ष संघटनावर अधिक भर दिला आहे. त्यांच्या दौऱ्याची प्राथमिक तयारीही कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे किमान त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वी किंवा दौऱ्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचा जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल का याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.