उन्हाळ्याची चाहूल लागताच, नागरिक थंड पाणी पिण्यासाठी लागणारी माठ व इलेक्ट्रिक साधनाचा वापर करतात. व्यावसायिक कंपन्याकडून नवनवीन सुविधा असलेले फ्रिज बाजारात विक्रीसाठी आणत असल्याने, कुंभारांना भुर्दंड बसत आहे. ग्रामीण भागात आजही कुंभाराने बनविलेले माठ आरोग्याच्या दृष्टीने फ्रिजपेक्षा उपयोगी आणि नैसगिक असल्याने, ग्रामीण भागात उन्हाळ्यात माठ खरेदीला प्राधान्य दिले जाते. कारण फ्रिजमधील पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला होणे व दातदुखीचे आजार उद्भवतात. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबाचे फ्रिज म्हणजे मातीचा माठ आजही प्रत्येक घरात दिसून येतो. बाजारात थंड पाण्यासाठी विविध विद्युत उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, गरिबांचा फ्रिज म्हणून आजही ग्रामीण भागात माठाला महत्त्व दिले जात आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत आठवडे बाजार बंद करण्यात आल्याने, कुंभार व्यवसायाला घरघर लागली असून, त्यामुळे कुंभारांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
आठवडे बाजार बंदमुळे कुंभारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST