शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे होऊनही मदत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 14:40 IST

सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने मदत जाहीर करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु, दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे.

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू आणि मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते तर या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून त्वरित करण्यात आलेले होते. परंतु दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेले नाही आह. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी शेतकरी कशी करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला त्यामुळे आता खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा लागली आहे. मात्र शासनाकडून वेळेत मदत मिळाली तर खरीप हंगामाची तयारी करता येणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

सरकार शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदत नेमकी कुठे थांबली आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर या विषयावर कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागावी, असा संभ्रम शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी