शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे होऊनही मदत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 14:40 IST

सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने मदत जाहीर करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु, दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे.

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू आणि मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते तर या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून त्वरित करण्यात आलेले होते. परंतु दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेले नाही आह. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी शेतकरी कशी करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला त्यामुळे आता खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा लागली आहे. मात्र शासनाकडून वेळेत मदत मिळाली तर खरीप हंगामाची तयारी करता येणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

सरकार शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदत नेमकी कुठे थांबली आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर या विषयावर कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागावी, असा संभ्रम शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी