लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धे : शहादा ते बोरद रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच वर्षापासून मागणी होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून कुठलीही दखल घेत जात नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून आगामी निवडणुकांसाठी होणा:या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.शहादा-बोरद रस्ता दुरवस्थेमुळे अरुंद झाला असून दोन वाहने पास होत नाही. या रस्त्याच्या साईडपट्टय़ांवर काळी माती टाकून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर वाहन चालविताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन अनेक जण जायबंदी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. त:हाडी ते परिवर्धा दरम्यानचा रस्ता तर फारच खराब झाला आहे. मागील पाच वर्षापासून या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी एकदाही भेट दिली नसल्याने आपले लोकप्रतिनिधी हरवल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या रस्त्याबाबत पाच वर्षापासून नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकांच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा त:हाडी, परिवर्धेसह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातही वाढले आहेत.
रस्ता दुरुस्ती होत नसल्याने मतदानावर बहिष्काराचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:32 IST