शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहित करुनही शेतकऱ्यांना मोबदला दिल्याने तसेच रस्ता कामामुळे शेतात पाणी जावून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहित करुनही शेतकऱ्यांना मोबदला दिल्याने तसेच रस्ता कामामुळे शेतात पाणी जावून पिकांचे नुकसान झाले आहे़ यामुळे जमिनीचा मोबदला आणि शेतातील पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करजई आणि डामरखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे़ शेतकºयांनी शहादा तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे़तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांची भेट घेत शेतकºयांनी हे निवेदन दिले़ निवेदनात, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करताना कोणत्याही प्रकारे शेतकºयांना विश्वासात घेतले नाही़ शेतकºयांच्या जमिनी हडप केल्या, शेतकºयांना तात्काळ मोबदला दिला जाईल असे जाहिर आश्वासन देण्यात आले होते़ दोन वर्षांपासून मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही़ रस्ता कामामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे़ अधिकाºयांनी शेतकºयांच्या जमिनी मोजून कोणत्याही प्रकारचा अहवाल शासनाला दिलेला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे़ भूमापन अधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागातील अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे़ ज्या शेतकºयांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत़ ते देशोधडीला लागले आहेत़ यामुळे सात दिवसांच्या आत चौकशी करुन न्याय न मिळाल्यास १५ आॅगस्टपासून न्याय मिळेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़हे निवेदन प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे़ प्रसंगी डामरखेडा, करजई आणि बुपकरी येथील पुरुषोत्तम पाटील, वासुदेव पाटील, जगन्नाथ पाटील, भीमा बुला पाटील, मोहन रामजी पाटील, यशवंत पाटील ,अरुण श्रीकृष्ण पाटील, मुकुंद मधुकर पाटील, भटू पाटील, छोटूलाल पाटील, नरसई पाटील, देवदास पाटील, भगवान पाटील, रविंद्र पाटील, हरी पाटील, गोपाळ पाटील, रामदास पाटील आदी उपस्थित होते़विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला तीन वर्षांपासून सुरूवात झाली आहे़ ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ दरम्यान करजई, बुपकरी, डामरखेडा आणि प्रकाशा शिवारालगत शेतजमिनी ठेकेदाराने शेतकºयांना विश्वासात न घेत बळकावल्या आहेत़ शेतकºयांची बाजू ऐकून न घेता शेतातून रस्ता तयार केला आहे़ याचा मोबदला शेतकºयांना अद्याप मिळालेला नाही़ शेतीपिकांच्या नुकसानीचीही रक्कम देण्यात आलेली नाही़ भूमी अधिग्रहण मोजमाप करून रेडी रेकनर नुसार व्याजासहीत वाढीव पाच टक्के रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनाद्वारे शेतकºयांनी जेलभरो, रास्ता रोको आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे़