शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहित करुनही शेतकऱ्यांना मोबदला दिल्याने तसेच रस्ता कामामुळे शेतात पाणी जावून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहित करुनही शेतकऱ्यांना मोबदला दिल्याने तसेच रस्ता कामामुळे शेतात पाणी जावून पिकांचे नुकसान झाले आहे़ यामुळे जमिनीचा मोबदला आणि शेतातील पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करजई आणि डामरखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे़ शेतकºयांनी शहादा तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे़तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांची भेट घेत शेतकºयांनी हे निवेदन दिले़ निवेदनात, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करताना कोणत्याही प्रकारे शेतकºयांना विश्वासात घेतले नाही़ शेतकºयांच्या जमिनी हडप केल्या, शेतकºयांना तात्काळ मोबदला दिला जाईल असे जाहिर आश्वासन देण्यात आले होते़ दोन वर्षांपासून मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही़ रस्ता कामामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे़ अधिकाºयांनी शेतकºयांच्या जमिनी मोजून कोणत्याही प्रकारचा अहवाल शासनाला दिलेला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे़ भूमापन अधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागातील अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे़ ज्या शेतकºयांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत़ ते देशोधडीला लागले आहेत़ यामुळे सात दिवसांच्या आत चौकशी करुन न्याय न मिळाल्यास १५ आॅगस्टपासून न्याय मिळेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़हे निवेदन प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे़ प्रसंगी डामरखेडा, करजई आणि बुपकरी येथील पुरुषोत्तम पाटील, वासुदेव पाटील, जगन्नाथ पाटील, भीमा बुला पाटील, मोहन रामजी पाटील, यशवंत पाटील ,अरुण श्रीकृष्ण पाटील, मुकुंद मधुकर पाटील, भटू पाटील, छोटूलाल पाटील, नरसई पाटील, देवदास पाटील, भगवान पाटील, रविंद्र पाटील, हरी पाटील, गोपाळ पाटील, रामदास पाटील आदी उपस्थित होते़विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला तीन वर्षांपासून सुरूवात झाली आहे़ ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ दरम्यान करजई, बुपकरी, डामरखेडा आणि प्रकाशा शिवारालगत शेतजमिनी ठेकेदाराने शेतकºयांना विश्वासात न घेत बळकावल्या आहेत़ शेतकºयांची बाजू ऐकून न घेता शेतातून रस्ता तयार केला आहे़ याचा मोबदला शेतकºयांना अद्याप मिळालेला नाही़ शेतीपिकांच्या नुकसानीचीही रक्कम देण्यात आलेली नाही़ भूमी अधिग्रहण मोजमाप करून रेडी रेकनर नुसार व्याजासहीत वाढीव पाच टक्के रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनाद्वारे शेतकºयांनी जेलभरो, रास्ता रोको आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे़