शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

दोन आठवडे दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:33 IST

कुलाबा वेधशाळा : ‘मान्सून ट्रफ’ हिमालयाजवळ स्थिरावल्याने परिणाम

नंदुरबार : ‘मान्सून ट्रफ’ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावले आहेत़ तसेच बंगालच्या उपसागरातसुध्दा कुठलाही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नसल्याने परिणामी उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने उसंत घेतलेली आह़े विशेषकरुन उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे तरी दमदार पावसाची सुतराम शक्यता नसल्याचे कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आह़ेनंदुरबारसह, जळगाव, धुळे आदी ठिकाणी आठवडाभरापासून पावसाने काहीशी उसंत घेतलेली आह़े विशेषत नंदुरबारात तर आतार्पयतच्या सर्वाधिक कमी पावसाची सरासरी 38.81 टक्के इतकी नोंद झालेली आह़े जिल्ह्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात करण्यात आली असून ती 30.44 टक्के इतकी आह़े नंदुरबारात दोन आठवडय़ांपूर्वी पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे पिकांना नवसंजीवणी मिळाली होती़ परंतु साधारणत मागील आठवडय़ाचा संपूर्ण कालखंड कोरडाच गेला होता़ कोरडे दिवस वाढतायजिल्ह्यात पावसाळ्यातील कोरडय़ा दिवसांच्या संख्येत वाढ होणे शेतक:यांसाठी चितेचा विषय ठरत आह़े मुसळधार पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ कुपनलिका, विहिर आदी कोरडय़ा आहेत़ त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत भिषण दुष्काळ पडण्याची अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत           आह़े मागील वर्षीच्या पावसाळ्यात 30 सप्टेंबर 2017 र्पयत झालेल्या पावसाची तालुका निहाय सरासरी व टक्केवारी बघता, नंदुरबार तालुका 594 मि़मी़ 92 टक्के, नवापूर 965 मि़मी़ 85.94 टक्के, शहादा 511 मि़मी़ 74़48 टक्के, तळोदा 711 मि़मी़ 92़2 टक्के, अक्कलकुवा 877 मि़मी 85़39 टक्के, अक्राणी 836 मि़मी 109.80 टक्के अशा प्रकारे मागील वर्षी एकूण सरासरी 89़61 टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती़तर यंदा 30 जुलैर्पयतची पावसाची आकडेवारी बघितली असता, नंदुरबार तालुक्यात आतार्पयत एकूण 196.30 मि़मी व 30.44 टक्के पावसाची नोंद झालेली आह़े तसेच नवापूर 365 मि़मी़ व 32.51 टक्के, शहादा 266 मि़मी़ व 38.77 टक्के, तळोदा 319 मि़मी़ व 41.28 टक्के, अक्कलकुवा 407 मि़मी़ 51.62 टक्के, अक्राणी 393 मि़मी व 39.63 टक्के अशा प्रकारे आतार्पयत सरासरी 324.38 मि़मी व 38.81 टक्के पावसाची नोंद झालेली आह़े कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे गरजेचेचांगल्या पजर्न्यमानासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे महत्वाचे ठरत असत़े परंतु सध्या उपसागरात कुठल्याही प्रकारचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही़ त्यामुळे साहजिकच याचा परिणाम पजर्न्यमानावर होत असतो़ सध्या तरी दोन आठवडय़ांर्पयत पावसाने विश्रांती घेतली असल्याचे मत हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़े परंतु त्यानंतरची पावसाची स्थिती ही वेळेवर निर्माण होणा:या भौगोलिक स्थितीवर अवलंबून राहणार असल्याचेही सांगण्यात आले आह़े महाराष्ट्राच्या पजर्न्यमानासाठी द्रोणीय वा:यांची स्थिती फार महत्वाची असत़े सध्या ‘मान्सून ट्रफ’ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाया पायथ्याशी घोंगावत आहेत़  त्यामुळे त्याचा परिणाम पजर्न्यमानावर होत आह़े असे असले तरी, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस नसला तरी, हलका  व मध्यम स्वरुपाचा पाऊस संभवतो़ अशा पावसामुळे जलस्त्रोतांवर याचा फारसा परिणाम होणार नसला तरी, पिकांवर याचा सकारात्मक परिणाम होणे अपेक्षीत आह़ेचक्रीवादळाचा धोका नाहीसध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे नाहीत तसेच अद्यापतरी कुठल्याही चक्रीवादळाचा धोका नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आह़े चक्रीवादळामुळे पजर्न्यमानास धोका निर्माण होत असतो़ त्यामुळे सध्या तरी असा कुठलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले आह़ेउत्तर-पूर्व भागात काही प्रमाणात ‘मान्सून ट्रफ’चा भाग आच्छादला आह़े त्यामुळे येत्या काही दिवसात याची वाटचाल दक्षिणेकडे होऊन याव्दारे मान्सून परतण्यास मदत होणार असल्याचे भाकित शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आह़े तरी या सर्व प्रक्रियेस दोन आठवडय़ांचा काळ लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारसह खान्देशात दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े