शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवडे दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:33 IST

कुलाबा वेधशाळा : ‘मान्सून ट्रफ’ हिमालयाजवळ स्थिरावल्याने परिणाम

नंदुरबार : ‘मान्सून ट्रफ’ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावले आहेत़ तसेच बंगालच्या उपसागरातसुध्दा कुठलाही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नसल्याने परिणामी उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने उसंत घेतलेली आह़े विशेषकरुन उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे तरी दमदार पावसाची सुतराम शक्यता नसल्याचे कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आह़ेनंदुरबारसह, जळगाव, धुळे आदी ठिकाणी आठवडाभरापासून पावसाने काहीशी उसंत घेतलेली आह़े विशेषत नंदुरबारात तर आतार्पयतच्या सर्वाधिक कमी पावसाची सरासरी 38.81 टक्के इतकी नोंद झालेली आह़े जिल्ह्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात करण्यात आली असून ती 30.44 टक्के इतकी आह़े नंदुरबारात दोन आठवडय़ांपूर्वी पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे पिकांना नवसंजीवणी मिळाली होती़ परंतु साधारणत मागील आठवडय़ाचा संपूर्ण कालखंड कोरडाच गेला होता़ कोरडे दिवस वाढतायजिल्ह्यात पावसाळ्यातील कोरडय़ा दिवसांच्या संख्येत वाढ होणे शेतक:यांसाठी चितेचा विषय ठरत आह़े मुसळधार पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ कुपनलिका, विहिर आदी कोरडय़ा आहेत़ त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत भिषण दुष्काळ पडण्याची अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत           आह़े मागील वर्षीच्या पावसाळ्यात 30 सप्टेंबर 2017 र्पयत झालेल्या पावसाची तालुका निहाय सरासरी व टक्केवारी बघता, नंदुरबार तालुका 594 मि़मी़ 92 टक्के, नवापूर 965 मि़मी़ 85.94 टक्के, शहादा 511 मि़मी़ 74़48 टक्के, तळोदा 711 मि़मी़ 92़2 टक्के, अक्कलकुवा 877 मि़मी 85़39 टक्के, अक्राणी 836 मि़मी 109.80 टक्के अशा प्रकारे मागील वर्षी एकूण सरासरी 89़61 टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती़तर यंदा 30 जुलैर्पयतची पावसाची आकडेवारी बघितली असता, नंदुरबार तालुक्यात आतार्पयत एकूण 196.30 मि़मी व 30.44 टक्के पावसाची नोंद झालेली आह़े तसेच नवापूर 365 मि़मी़ व 32.51 टक्के, शहादा 266 मि़मी़ व 38.77 टक्के, तळोदा 319 मि़मी़ व 41.28 टक्के, अक्कलकुवा 407 मि़मी़ 51.62 टक्के, अक्राणी 393 मि़मी व 39.63 टक्के अशा प्रकारे आतार्पयत सरासरी 324.38 मि़मी व 38.81 टक्के पावसाची नोंद झालेली आह़े कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे गरजेचेचांगल्या पजर्न्यमानासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे महत्वाचे ठरत असत़े परंतु सध्या उपसागरात कुठल्याही प्रकारचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही़ त्यामुळे साहजिकच याचा परिणाम पजर्न्यमानावर होत असतो़ सध्या तरी दोन आठवडय़ांर्पयत पावसाने विश्रांती घेतली असल्याचे मत हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़े परंतु त्यानंतरची पावसाची स्थिती ही वेळेवर निर्माण होणा:या भौगोलिक स्थितीवर अवलंबून राहणार असल्याचेही सांगण्यात आले आह़े महाराष्ट्राच्या पजर्न्यमानासाठी द्रोणीय वा:यांची स्थिती फार महत्वाची असत़े सध्या ‘मान्सून ट्रफ’ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाया पायथ्याशी घोंगावत आहेत़  त्यामुळे त्याचा परिणाम पजर्न्यमानावर होत आह़े असे असले तरी, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस नसला तरी, हलका  व मध्यम स्वरुपाचा पाऊस संभवतो़ अशा पावसामुळे जलस्त्रोतांवर याचा फारसा परिणाम होणार नसला तरी, पिकांवर याचा सकारात्मक परिणाम होणे अपेक्षीत आह़ेचक्रीवादळाचा धोका नाहीसध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे नाहीत तसेच अद्यापतरी कुठल्याही चक्रीवादळाचा धोका नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आह़े चक्रीवादळामुळे पजर्न्यमानास धोका निर्माण होत असतो़ त्यामुळे सध्या तरी असा कुठलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले आह़ेउत्तर-पूर्व भागात काही प्रमाणात ‘मान्सून ट्रफ’चा भाग आच्छादला आह़े त्यामुळे येत्या काही दिवसात याची वाटचाल दक्षिणेकडे होऊन याव्दारे मान्सून परतण्यास मदत होणार असल्याचे भाकित शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आह़े तरी या सर्व प्रक्रियेस दोन आठवडय़ांचा काळ लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारसह खान्देशात दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े