शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दाहीगाव गुरव समाजाच्या बैठकीत विविध निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज उन्नती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तिमाही सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उन्नती संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गुरव होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,समस्त दाहीगाव गुरव समाज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, नंदुरबार गुरव समाज अध्यक्ष प्रविण गुरव माजी अध्यक्ष विश्वासराव भामरे, भीमराव गुरव, नगरसेविका भावना गुरव, मनीषा गुरव, शशिकांत बेगराज, मधुकर गुरव, अशोक गुरव, रवींद्र गुरव, पुंडलिक गुरव, विश्वनाथ गुरव, ह.भ.प.नरेंद्र गुरव, ह.भ.प. वासुदेव महाराज, संजय गुरव, गोरख गुरव, सुरेश गुरव, मोतीलाल गुरव , बद्रीनाथ गुरव , निंबा गुरव, वामन गुरव, अशोक गुरव, नितीन गुरव, दीनानाथ गुरव, छोटू गुरव, नानाभाऊ गुरव, प्रकाश गुरव, राजेंद्र सोनवणे, प्रमोद गुरव, रामदास गुरव, प्रतिमा गुरव, सोनाली गुरव, पुरुषोत्तम गुरव, अरुण गुरव, आदी व्यासपीठावर होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत काशिबा महाराज यांचा प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव नाना गुरव यांनी केले. या वेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी समाजात काम करताना तन-मन-धनाने करावे आपसातील वैर विसरून समाज एकजुटीसाठी प्रयत्न करावेत. शासनाचा योजनांचा लाभ समाजबांधवांना मिळवून द्यावा, गुरव समाज बेल फुल देऊन आपले उदरनिर्वाह करतो गुरव समाजाची शहनाई हे मंगल वाद्य गुरव समाजाचे प्रतीक आहे. मंगल वाद्य ही परंपरा त्यांनी जोपासावी असेही सांगितले.त्यानंतर गुरव समाजाच्या पुढील तीन वषार्साठी अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातून सुरेश केशव गुरव यांची निवड करण्यात आली. निवडणूक न करता सुरत, नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, येथील समाज अध्यक्षांनी तळोदा येथील सुरेश केशव गुरव यांना पाठिंबा दिल्यामुळे सवार्नुमते त्यांना अध्यक्ष करण्यात आले. निवड झाल्यानंतर त्यांनी सांगितले की संस्थेचा अध्यक्ष पदाला मी न्याय देईन, समाजातील घटकांसाठी विविध योजना आणण्याचा मी प्रयत्न करीन, पर राज्यातील समाजातील रोटी-बेटी व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले याप्रसंगी दाहीगाव अध्यक्ष नरेंद्र गुरव यांनी निवडणूक न करता सर्वांच्या संमतीने तीन राज्यातुन अध्यक्षाची निवड झाली. म्हणजे आपली एकता आहे. समाजामध्ये राजकारण न करता समाजकारण करून समाजाची प्रगती कशी होईल याचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नंदुरबार येथील संत काशिबा महाराज गुरव चौकात मान्यवरांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रविण गुरव यांचा वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी समाजाला शितशव पेटी दान केली आहे. जी समाजातील घटकांना वापरण्यासाठी मोफत मिळणार आहे.कार्यक्रमासाठी प्रविण गुरव, सुधीर गुरव, हेमंत गुरव, रघुनाथ गुरव, किरण गुरव, विजय शिरसाट, शशिकांत गुरव, वैभव गुरव, गणेश गुरव, सुधाकर गुरव, भूपेंद्र गुरव, गणेश गुरव, नानाभाऊ गुरव, हरिश्चंद्र गुरव, नगिन गुरव, पुरुषोत्तम गुरव, आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन वाय.आर. गुरव, आभार सचिव शशिकांत गुरव यांनी मानले.