शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’

By admin | Updated: March 27, 2017 00:09 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिखाऊपणा : तिन्ही चौफुलींवरील स्थिती

नंदुरबार : दोन आठवड्यांपूर्वी वाघेश्वरी चौफुलीवरील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. दर दोन वर्षांनी असे प्रकार सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा नाकर्तेपणा की, अतिक्रमणधारकांची मुजोरी? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशीच स्थिती कोरीट चौफुली व नवापूर रोड चौफुलीवरील आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे या भागात अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे.
शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया वाघेश्वरी चौफुलीवर साक्री, नवापूर, धुळे तसेच वळण रस्ते येत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी विविध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थाटले आहेत. परिणामी चौफुलीवर वर्दळ वाढली आहे. त्याचा परिणाम अपघात वाढण्यात झाला आहे. हा परिसर व येथे येणारे सर्व रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची निगा राखणे, डागडुजी करणे, ठरावीक काळानंतर नवीन रस्ते तयार करणे, अशी कामे करावी लागतात. शिवाय अतिक्रमण वाढले असल्यास ते लागलीच काढण्याची मुभादेखील या विभागाला असते. वाघेश्वरी चौफुलीच्या चारही बाजूंनी असलेले अतिक्रमण दोन आठवड्यांपूर्वी बांधकाम विभागाने काढले होते. जवळपास ३० ते ४० कच्ची अतिक्रमणे नेस्तानुभूत करण्यात आली होती. काहींनी स्वत:हून टपरी, लहान दुकाने, हातगाडीवरील दुकान काढून घेतले होते. त्यामुळे हा परिसर विस्तृत व मोकळा झाला होता. परिणामी वाहनांना उभे राहण्यास जागा तसेच प्रवाशांनादेखील ते सोयीचे झाले होते. अतिक्रमण काढल्यानंतर लागलीच त्या ठिकाणी काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही. शिवाय पुन्हा अतिक्रमण होणार     नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.
पुन्हा जैसे थे...
अतिक्रमण काढलेल्या जागी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या जागेवर जी टपरी, दुकान होते, ते पुन्हा ठेवण्यात आले आहे. याशिवाय मांस विक्रेत्यांनीदेखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे प्रयोजन काय होते, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चौफुलीच्या चारही भागांत ३० ते ४० जणांनी दोन दिवसांत पुन्हा अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळ, गतिरोधकाचा अभाव यामुळे अपघातदेखील वाढले आहेत.
वाहतूक पोलिसांनाही ताण
या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येते. परंतु चारही बाजूंनी अतिक्रमणामुळे त्यांनाही रहदारी नियमन करताना ताण सहन करावा लागतो.