शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

20 हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे 38 कोटी रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे 38 कोटी रुपयांचा भरपाई देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात विभागीय आयुक्त यांच्याकडे दिला आह़े या प्रस्तावाची अद्यापही शासनाने दखल घेतलेली नसल्याने शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत़               जिल्ह्यात यंदा दमदार पावसामुळे 2 लाख 88 हजार 804 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती़ सरासरीच्या 108 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान होत़े दरम्यान जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील विविध भागात अतीवृष्टी  झाल्याने कोरड आणि बागायती पिके नुकसानीच्या गर्तेत सापडली होती़  ब:याच ठिकाणी शेतातील माती आणि पिक वाहून गेल्याचे कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून समोर आले होत़े  ऑक्टोबर मध्यार्पयत पंचनामे सुरु असलेले पंचनामे पूर्ण झाल्यानंतर 13 हजार 101 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे देण्यात आला होता़ निवडणूकीपूर्वी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठवला गेला होता़ निवडणूकीनंतर त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता होती़ परंतू ती झाली नाही़ तूर्तास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 8 हजार हेक्टरी मदत जाहिर केली आह़े परंतू अतीवृष्टीतील बाधित शेतक:यांना मदत देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात केलेल्या या पंचनाम्यांमध्ये बराच घोळ असल्याचे दिसून आले होत़े अतीवृष्टीमुळे जिल्ह्यात किमान 1 लाख हेक्टर शेतजमिन आणि पिकांचे नुकसान झाल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले होत़े प्रत्यक्ष पंचनाम्यांमध्ये मात्र फक्त 13 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्यांमधून समोर आली़ सर्वच तालुक्यात वेळोवेळी 62 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होऊनही योग्य ती कारवाई झालेली नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े प्रशासनाकडे क्षेत्रनिहाय अतीवृष्टीची नोंद आह़े पंचनाम्यांच्या अहवालानुसार अतीवृष्टीबाधित 20 हजार 155 शेतक:यांना या पुढे मदत कशी मिळणार याकडे संबधितांचे लक्ष लागून आह़े कृषी विभागाच्या अहवालानुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात 12 हजार 991 शेतक:यांच्या 7 हजार 440 हेक्टर कोरडवाहू तर बागायत क्षेत्रातील 7 हजार 164 शेतक:यांच्या 5 हजार 661 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े त्यांच्यासाठी 38 कोटी 15 लाख 41 हजार रुपयांची मदत प्रस्तावित आह़े ही मदत मिळणार कधी याकडे शेतक:यांचे लक्ष लागून आह़े  नंदुरबार तालुक्यातील 804 शेतक:यांना 4 कोटी 37 लाख 76 हजार, नवापुर तालुक्यात 609 शेतक:यांना 68 लाख 90 हजार, अक्कलकुवा 3320 शेतक:यांना 45 लाख 29 हजार, शहादा- 5 हजार 619 बाधित शेतक:यांना 6 कोटी 40 लाख 19 हजार, तळोदा - 2 हजार 339 शेतक:यांना 2 कोटी 15 लाख 4 हजार तर धडगाव तालुक्याच्या 210 शेतक:यांना 1 कोटी 10 लाख 26 हजार रुपयांची मदत प्रस्तावित आह़ेनंदुरबार तालुक्यात 2 हजार 145, नवापुर तालुक्यात 337, अक्कलकुवा 222, शहादा 3 हजार 138, तळोदा 1 हजार 56 तर धडगाव तालुक्यात 540 हेक्टर शेतजमिनीचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याचे अहवालात म्हटले आह़े सप्टेंबर अखेरीस पाठवलेल्या या प्रस्तावानंतरही काही ठिकाणी अतीवृष्टी झाल्याने त्यांचे पंचनामे झालेले नसल्याची माहिती आह़े