शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

बारावीचा निकाल ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहिर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहिर केला़ यात जिल्ह्याचा निकाल हा ८०़३५ टक्के एवढा लागला असून साडेबारा हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ जाहिर निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे़ तिन्ही विद्याशाखांमधून एकत्रिपणे ८४़ टक्के मुली तर ७७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत़राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या़ जिल्ह्यातील ११३ कनिष्ठ महाविद्यालयांच्या १५ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा दिली होती़ जाहिर झालेल्या निकालात यातील १२ हजार ४६६ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत़ दुपारी १ वाजेनंतर शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहिर करण्यात आला़ लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असली तरी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना माहिती देत त्यांचे कौतूक करण्यात येत होते़ जिल्ह्यातील सहा तालुक्यांची टक्केवारी यंदाच्या निकालात सुधारली असल्याने निकालातून दिसून आले आहे़लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकांना निकालांची प्रतिक्षा होती़ विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकालाचे अवलोकन केले आहे़ आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर सोशल मिडियातून नातेवाईक व आप्तेष्टांकडून त्यांना शुभेच्छा संदेश देण्यात येत होते़अक्कलकुवा तालुक्यातील १७ कनिष्ठ महाविद्यालयातून १ हजार ८०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ यातील १ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तालुक्याचा निकाल ८४़८९ टक्के आहे़धडगाव तालुक्यात ६ ज्युनियर कॉलेजेमधील ९०० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले़ यातील ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे़ तालुक्यातची टक्केवारी ६०़४४ टक्के एवढी आहे़नंदुरबार तालुक्यात ४० कनिष्ठ महाविद्यालयांचे ४ हजार ५८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ यातील ३ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ निकाल ७३़३५ टक्के लागला आहे़शहादा तालुक्यातील २४ महाविद्यालयांचे ३ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील ३ हजार ३३५ विद्यार्थी पास झाले़ तालुक्याचा निकाल ८४़७७ टक्के आहे़नवापूर तालुक्यात १९ कनिष्ठ महाविद्यालयातील २ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ यातील २ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल जिल्ह्यातून सर्वाधिक ८७़८७ टक्के एवढा लागला आहे़तळोदा तालुक्यातील सात महाविद्यालयातून १ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ यातील १ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण होवून टक्केवारी ८१़५० टक्के राहिली आहे़यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १५ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ यातील १५ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ यातून १२ हजार ४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ गुणवत्ता श्रेणीत ७९१, प्रथम श्रेणी ५ हजार २११, द्वितीय श्रेणी ६ हजार १२४ तर पास श्रेणीत जिल्ह्यातील ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ परीक्षेदरम्यान जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर कॉपी करताना आढळल्याने २३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होतीजिल्ह्यात परीक्षेसाठी ८ हजार ७४४ मुले बसले होते़ यातील ६ हजार ७५३ मुले उत्तीर्ण झाले़दुसरीकडे तिन्ही शाखांमधील ६ हजार ९७८ मुलींनी परीक्षा दिली होती़ यातील ५ हजार ८८० मुली परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत़मुलांच्या तुलनेत मुलींच्या पास होण्याची टक्केवारी ही अधिक असल्याने त्यांनी यंदाही बाजी मारल्याचे दिसून आले आहे़