शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आदिवासी मौखिक साहित्य परिषद व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आदिवासी मौखिक साहित्य परिषद व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव घेण्यात आला. या सोहळ्यात आदिवासी संस्कृती, साहित्य व चालीरितींचे जतन करणा:यांना गौरविण्यात आले.महोत्सवात आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, सेवानिवृत्त वनअधिकारी नामदेव पटले, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे संयोजक भिमसिंग वळवी, वासुदेव गांगुर्डे, दामू ठाकरे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी देविदास बोरसे, पं.स. सभापती वांगीबाई पावरा, पं.स.चे माजी सभापती दरबारसिंग पावरा, सुरेश नाईक, वनिताबाई पटले, चिमण ठाकरे, हरी खराडे, राजू जाधव, प्रदीप गावीत, दारासिंग ठाकरे, रतिलाल पवार, काशीराम ठाकरे, कुवरसिंग पाडवी, सत्तरसिंग ठाकरे, सहदेव वाघ, गणेश ठाकरे, वसंत भंडारी, खेत्या वळवी, भूरसिंग पवार, आपसिंग निकुंभ, अशोक शेमले,  देवीसिंग पावरा, दिगंबर पावरा, काशीराम पावरा आदी उपस्थित   होते. वाहरू सोनवणे म्हणाले की, आदिवासी हा उत्सवप्रिय समाज असल्याने प्रत्येक आदिवासीने जोरदार उत्सव साजरे केले पाहिजे. परंतु विविध आमिषे प्रलोभने देत नाचायला लावतील, त्यांच्यापासून जरा सावधच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी लग्नातील गीते व ढोलसह अन्य पारंपरिक वाद्यांचा आवाज, ताल-सूर यांचा निसर्गाशी कसा संबंध येतो हे त्यांनी विविध गाणी व आवाजातून पटवून दिले. आदिवासी संस्कृती, गीते व अन्य सर्वच माध्यमातून फसवणूक होत आहे यापासून सावध राहण्याचे आवाहन करीत आपली संस्कृती, गीते, चालीरीती दूषित झाल्या आहे, हे केवळ भोगवादी विचारांचा शिरकाव झाल्यामुळे झाल्याचे सिद्ध केले. आज शासनामार्फत भजनी साहित्य दिले जात आहे. ते घ्या परंतु आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब दर्शविणारी भजने म्हटली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही सोनवणे यांनी व्यक्त केली. राजेंद्रकुमार गावीत म्हणाले की, आदिवासी संस्कृती व चालीरीती अप्रतिम असल्यामुळे यावर संशोधने होत आहे. त्यामुळे ही संस्कृती, चालीरीती टिकल्या पाहिजे. परंतु त्यासाठी अत्यल्प प्रय} होत आहे. ही संस्कृती जतन करीत संवर्धनासाठी जे प्रय} करीत आहे ते त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीच अधिक योगदान देत आहेत. प्रत्येक आदिवासीने आपले हक्क व स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. साहित्यिक विश्राम वळवी यांनी आकाश-पाताळ व प्रकृतीशी आदिवासींच्या नाळ जुळल्या हे स्पष्ट करताना आकाशवाणीचे पहिले संगीत आदिवासींच्या गीतांमधून घेतल्याचे सांगितले. किसन महाराज यांनी आदिवासींचा भूतकाळ, वर्तमान व भवितव्य यावर प्रकाश टाकला. वनिताबाई पटले यांनी आदिवासींचे शिक्षण, मौखिक व लिखित साहित्यावर मार्गदर्शन केले. नरेंद्र पाडवी यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रतीक ढोल या वाद्याचे, घडण, शास्त्रीय व सांस्कृतिक महत्त्व पटवून दिले.