शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

आदिवासी खाते आणि जिल्ह्याचे असेही नाते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 12:41 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील आदिवासी विकास विभाग मंत्रालय आणि जिल्ह्याचे नाते अधिकच दृढ असून ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील आदिवासी विकास विभाग मंत्रालय आणि जिल्ह्याचे नाते अधिकच दृढ असून अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्या रुपाने आता जिल्ह्यातील पाचव्या सुपुत्राकडे या खात्याचा कारभार आला आहे़ त्यामुळे आदिवासींच्या विकासाच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत़राज्यातील लोकसंख्येच्या तुलनेत नंदुरबार जिल्हा हा सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे़ जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६९ टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे़ साहाजिकच राज्याच्या मंत्रीमंडळात आदिवासी विकास विभागाची जबाबदारी कुणाकडे सोपवावी याचा विचार होतो तेव्हा नंदुरबार जिल्ह्याचा विचार खासकरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे़ राज्याच्या मंत्रीमंडळात आदिवासी विकास विभागाचे खाते जेव्हापासून स्वतंत्र झाले तेव्हा सर्वप्रथम जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी त्याचा पदभार सांभाळला आहे. या खात्याचा पदभार त्यांना दोनवेळा मिळाला़ त्यांच्या कारकिर्दित नव्या योजनांना सुरुवात झाली़ त्यानंतर २००४ मध्ये डॉ.विजयकुमार गावीत यांनी या खात्याचा पदभार सांभाळला. पुढे अ‍ॅड.पद्माकर वळवी यांना याच खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर जिल्ह्याचेच सुपुत्र आणि पालघरमधून विजयी झालेले राजेंद्र गावीत यांनाही या खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले होते. आता राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अ‍ॅड.के.सी. पाडवी यांना या खात्याचा पदभार मिळाला आहे. याशिवाय आदिवासींशी संबधित वनखात्याची जबाबदारीदेखील जिल्ह्याने दोनवेळा पार पाडली आहे़ त्यात सुरुपसिंग नाईक हे कॅबिनेट मंत्री होते़ तर स्व़ दिलवरसिंग पाडवी हे वनखात्याचे राज्यमंत्री राहिले आहेत़राज्यात सर्वात मागास म्हणून जे तालुके ओळखले जातात त्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याचे अ‍ॅड.के.सी. पाडवी हे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. हे दोन्ही तालुके १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे तालुके आहेत. विशेषत: या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांपर्यंत अद्याप रस्ते नसल्याने समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक गावे अजूनही लांब आहेत. याच भागातील लोकप्रतिनिधीला आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मिळाल्याने लोकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. अ‍ॅड.के.सी. पाडवी हे आदिवासी संस्कृतीचे अभ्यासकही आहेत. सांस्कृतिक परंपरा टिकवण्यासाठी त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे. आदिवासींची संस्कृती आणि त्यांचे घटनात्मक अधिकार, न्याय व त्यांचे प्रश्न यासंदर्भात निघणाऱ्या मासिकाचे संपादक पदही त्यांनी भूषविले आहे. त्याचबरोबर ३० वर्षे आमदार असल्याने राज्यातील सर्वच भागातील आदिवासींचे प्रश्न त्यांना ज्ञात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा लागून आहेत.डॉ.विजयकुमार गावीत यांची कारकिर्द वादातीत ठरली असली तरी त्यांच्या कारकिर्दीत आदिवासी विकास विभागाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आदिवासींमध्ये त्याबाबत जनजागृती करण्यासाठी तत्कालिन प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर यश आले होते. काही नव्या योजनाही त्यांनी सुरु केल्या होत्या़ त्यांच्या कारकिर्दीत ज्या त्रुटी असतील त्या दूर करीत या खात्याचा कारभार अधिक गतीमान करण्याचे आव्हान अ‍ॅड.पाडवी यांच्यासमोर असून त्यांच्या कारकिर्दीत या खात्याचा बहुमान उंचावेल व आदिवासींच्या प्रगतीलाही गती येईल, अशी अपेक्षा लागून आहे.