या बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने साठवण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांनाही काही उपयोग होत नाही. बंधाऱ्यांच्या आजूबाजूचे रुंदीकरणही कमी असल्याने बाजूची माती कोरून पाणी शेतात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करून नव्याने बंधारा बांधण्यात यावा व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात अनेक ठिकाणी बंधाऱ्याचे काम निकृष्टपणे सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे निदर्शनास आले आहे. तशा तक्रारीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. चांगल्या प्रतीचे काम होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. जेणेकरून साठवण बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर घेता येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
माझ्या शेताजवळच साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. परंतु निकृष्ट कामामुळे यावर्षी पहिल्याच पावसात साठवण बंधारे तुटून पाणी पूर्ण वाहून गेले. या बंधाऱ्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी किंवा नवीन बंधारा बांधावा. जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल'.
-विनोद पवार, शेतकरी, असलोद, ता. शहादा