शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

साहेब तुम्हीच सांगा, कसं जगायचं... कसं शिकायचं ! प्रशासन चेष्टा करून निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:46 IST

केलखाडीत आलेले जेसीबी एका दिवसात गेले माघारी

रमाकांत पाटीलनंदुरबार : नदीवर पूल नसल्याने जीव मुठीत घेऊन फांदीवरून नदी पार करणाऱ्या ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने जेसीबी तर पाठविले पण एका दिवसातच ते माघारी गेल्याने आता पूल होणार की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पूल आणि रस्त्याअभावी झोळीतून आरोग्य केंद्रात रूग्ण नेताना गेल्या दोन वर्षात याच ठिकाणी तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर या जीवघेण्या कसरतीमुळे शाळेतील पटसंख्याही घटली आहे. 

सातपुड्याच्या पहिल्याच रांगेत केलखाडी हे गंगापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव. या गावाला ग्रामपंचायतीपासून तर शाळा, आरोग्य केंद्र, बाजार हाट तसेच तालुका ठिकाणावर जायचे असेल तर किमान पाच किलोमीटरची डोंगर उताराच्या रस्तावर पायपीट करून तसेच नदी ओलांडून जावे लागते. पहाडातून उतारावरून ही नदी वाहत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग अधिक असतो.  रुग्णालाही झोळीत टाकून आणावे लागते. गेल्या दोन वर्षात वेळीच उपचार न मिळाल्याने झोळीत आणणाऱ्या रुग्णांपैकी दोन सर्पदंश झालेले आणि एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. तर काही महिन्यापूर्वीच एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्याची वेळ आली होती.  

अभियंत्यांचा जत्था आला, पण काहीच हालचाल नाही   या समस्येचे छायाचित्र ‘लोकमत’ने ३० जूनला प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. अभियंत्यांचा जत्था आला. सर्वेक्षणाचे चित्र रंगवले. जेसीबीआणून काम सुरू केले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे जेसीबी कुठे गेले ते ग्रामस्थांनाही माहिती नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील त्याठिकाणी गेले. झोळीतून रुग्ण घेऊन जाताना त्यांनी पाहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावून २७ कोटी खर्चून ६० ठिकाणी साकव बांधण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात १० दिवसानंतर येथे भेट दिली असता तेथे कुठल्याही हालचाली नसल्याचे चित्र आहे.    

केलखाडी येथे साकव बांधण्याला आजच आपण प्रशासकीय मंजुरी दिली असून, त्याचे टेंडर काढण्याचीही सूचना केली आहे.  तत्काळ तेथे काम सुरू होईल. ग्रामस्थांना तात्पुरती तत्काळ काही सुविधा करता येईल का, याबाबत सूचनाही आपण दिल्या आहेत.  - डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार 

वर्षानुवर्षे आम्हाला पावसाळ्यात जीवमुठीत घेऊन फांदीचा आधार घेत यावे लागते. या कसरतीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना परिस्थिती नसतानाही बाहेर शिकायला पाठविले आहे. तर काहींनी शिक्षण सोडले आहे. दोन वर्षांपूर्वी शाळेतील पटसंख्या ४० होती ती आता २१ वर आली आहे. - शिवदास वसावे, ग्रामस्थ, केलखाडी