शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

साहेब तुम्हीच सांगा, कसं जगायचं... कसं शिकायचं ! प्रशासन चेष्टा करून निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:46 IST

केलखाडीत आलेले जेसीबी एका दिवसात गेले माघारी

रमाकांत पाटीलनंदुरबार : नदीवर पूल नसल्याने जीव मुठीत घेऊन फांदीवरून नदी पार करणाऱ्या ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने जेसीबी तर पाठविले पण एका दिवसातच ते माघारी गेल्याने आता पूल होणार की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पूल आणि रस्त्याअभावी झोळीतून आरोग्य केंद्रात रूग्ण नेताना गेल्या दोन वर्षात याच ठिकाणी तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर या जीवघेण्या कसरतीमुळे शाळेतील पटसंख्याही घटली आहे. 

सातपुड्याच्या पहिल्याच रांगेत केलखाडी हे गंगापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव. या गावाला ग्रामपंचायतीपासून तर शाळा, आरोग्य केंद्र, बाजार हाट तसेच तालुका ठिकाणावर जायचे असेल तर किमान पाच किलोमीटरची डोंगर उताराच्या रस्तावर पायपीट करून तसेच नदी ओलांडून जावे लागते. पहाडातून उतारावरून ही नदी वाहत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग अधिक असतो.  रुग्णालाही झोळीत टाकून आणावे लागते. गेल्या दोन वर्षात वेळीच उपचार न मिळाल्याने झोळीत आणणाऱ्या रुग्णांपैकी दोन सर्पदंश झालेले आणि एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. तर काही महिन्यापूर्वीच एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्याची वेळ आली होती.  

अभियंत्यांचा जत्था आला, पण काहीच हालचाल नाही   या समस्येचे छायाचित्र ‘लोकमत’ने ३० जूनला प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. अभियंत्यांचा जत्था आला. सर्वेक्षणाचे चित्र रंगवले. जेसीबीआणून काम सुरू केले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे जेसीबी कुठे गेले ते ग्रामस्थांनाही माहिती नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील त्याठिकाणी गेले. झोळीतून रुग्ण घेऊन जाताना त्यांनी पाहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावून २७ कोटी खर्चून ६० ठिकाणी साकव बांधण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात १० दिवसानंतर येथे भेट दिली असता तेथे कुठल्याही हालचाली नसल्याचे चित्र आहे.    

केलखाडी येथे साकव बांधण्याला आजच आपण प्रशासकीय मंजुरी दिली असून, त्याचे टेंडर काढण्याचीही सूचना केली आहे.  तत्काळ तेथे काम सुरू होईल. ग्रामस्थांना तात्पुरती तत्काळ काही सुविधा करता येईल का, याबाबत सूचनाही आपण दिल्या आहेत.  - डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार 

वर्षानुवर्षे आम्हाला पावसाळ्यात जीवमुठीत घेऊन फांदीचा आधार घेत यावे लागते. या कसरतीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना परिस्थिती नसतानाही बाहेर शिकायला पाठविले आहे. तर काहींनी शिक्षण सोडले आहे. दोन वर्षांपूर्वी शाळेतील पटसंख्या ४० होती ती आता २१ वर आली आहे. - शिवदास वसावे, ग्रामस्थ, केलखाडी