शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
4
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
5
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
6
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
7
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
8
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
9
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
10
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
11
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
12
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
13
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
14
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
15
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
16
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
17
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
18
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
19
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
20
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 

साहेब तुम्हीच सांगा, कसं जगायचं... कसं शिकायचं ! प्रशासन चेष्टा करून निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:46 IST

केलखाडीत आलेले जेसीबी एका दिवसात गेले माघारी

रमाकांत पाटीलनंदुरबार : नदीवर पूल नसल्याने जीव मुठीत घेऊन फांदीवरून नदी पार करणाऱ्या ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने जेसीबी तर पाठविले पण एका दिवसातच ते माघारी गेल्याने आता पूल होणार की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पूल आणि रस्त्याअभावी झोळीतून आरोग्य केंद्रात रूग्ण नेताना गेल्या दोन वर्षात याच ठिकाणी तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर या जीवघेण्या कसरतीमुळे शाळेतील पटसंख्याही घटली आहे. 

सातपुड्याच्या पहिल्याच रांगेत केलखाडी हे गंगापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव. या गावाला ग्रामपंचायतीपासून तर शाळा, आरोग्य केंद्र, बाजार हाट तसेच तालुका ठिकाणावर जायचे असेल तर किमान पाच किलोमीटरची डोंगर उताराच्या रस्तावर पायपीट करून तसेच नदी ओलांडून जावे लागते. पहाडातून उतारावरून ही नदी वाहत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग अधिक असतो.  रुग्णालाही झोळीत टाकून आणावे लागते. गेल्या दोन वर्षात वेळीच उपचार न मिळाल्याने झोळीत आणणाऱ्या रुग्णांपैकी दोन सर्पदंश झालेले आणि एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. तर काही महिन्यापूर्वीच एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्याची वेळ आली होती.  

अभियंत्यांचा जत्था आला, पण काहीच हालचाल नाही   या समस्येचे छायाचित्र ‘लोकमत’ने ३० जूनला प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. अभियंत्यांचा जत्था आला. सर्वेक्षणाचे चित्र रंगवले. जेसीबीआणून काम सुरू केले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे जेसीबी कुठे गेले ते ग्रामस्थांनाही माहिती नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील त्याठिकाणी गेले. झोळीतून रुग्ण घेऊन जाताना त्यांनी पाहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावून २७ कोटी खर्चून ६० ठिकाणी साकव बांधण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात १० दिवसानंतर येथे भेट दिली असता तेथे कुठल्याही हालचाली नसल्याचे चित्र आहे.    

केलखाडी येथे साकव बांधण्याला आजच आपण प्रशासकीय मंजुरी दिली असून, त्याचे टेंडर काढण्याचीही सूचना केली आहे.  तत्काळ तेथे काम सुरू होईल. ग्रामस्थांना तात्पुरती तत्काळ काही सुविधा करता येईल का, याबाबत सूचनाही आपण दिल्या आहेत.  - डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार 

वर्षानुवर्षे आम्हाला पावसाळ्यात जीवमुठीत घेऊन फांदीचा आधार घेत यावे लागते. या कसरतीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना परिस्थिती नसतानाही बाहेर शिकायला पाठविले आहे. तर काहींनी शिक्षण सोडले आहे. दोन वर्षांपूर्वी शाळेतील पटसंख्या ४० होती ती आता २१ वर आली आहे. - शिवदास वसावे, ग्रामस्थ, केलखाडी